मुंबई

परप्रांतीयासाठी दिलासादायक बातमी, लवकरच मुंबईतून सुटू शकते विशेष ट्रेन!

सकाळवृत्तसेवा

मुंबई  सध्या देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन जाहिर झाल्यापासून देशभरातले मजूर, कामगार वेगवेगळ्या राज्यात अडकले गेले. त्यानंतर तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात या मजूरांना कामगारांना आपआपल्या राज्यात परत पाठवण्याची तयारी गेली आणि त्यानुसार त्यांच्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या. महाराष्ट्रातून पहिली ट्रेनही भिवंडी आणि नाशिकहून सोडण्यात आली. त्यानंतर आता मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी लवकरच मुंबईतूनही रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता मुंबईतूनही विशेष ट्रेन सोडली जाऊ शकते.  

मुंबईत अडकलेले मजूर आणि कामगार हे प्रामुख्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातून आणि मुंबईतल्या जवळच्या रेल्वे स्थानकावरुन आधीच रेल्वेगाड्या रवाना झाल्या आहेत. मात्र अद्याप प्रत्यक्षात मुंबईतल्या कुठल्याही रेल्वे स्थानकावरुन मजुरांना नेणारी गाडी सोडण्यात आलेली नाही. या मजुरांबाबत उत्तर प्रदेश सरकारशी राज्य सरकारनं चर्चा देखील केली. त्यावेळी काही अटी असल्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र आता ते प्रश्न मिटले असून मुंबईतून रेल्वेगाड्यांनी परप्रांतीयांना नेण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.

याबाबत राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनासी चर्चा केली असून अधिकच्या रेल्वे गाड्यांची मागणी केली आहे. दरम्यान राज्याला जेवढ्या रेल्वेगाड्यांची गरज आहे त्याच्या तुलनेत खूप कमी गाड्या दिल्या जात आहे. त्याबद्दल बैठकीत नाराजी देखील व्यक्त केली गेली. 

हजारो मजूर- कामगार स्वगृही 

पहिल्यांदा नाशिक येथून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दिशेनं मोठ्या संख्येने रेल्वेनं मजुर रवाना झाले. त्यानंतर भिवंडी स्थानकातूनही एक हजारहून अधिक मजुरांना घेऊन रेल्वे गोरखपूर दिशेने रवाना झाली. 2 मे रोजी मध्य रात्री 1 वाजता भिवंडी रेल्वे स्थानकातून गोरखपूरकडे ही ट्रेन रवाना झाली. त्यामध्ये 1104 मजूर होते. तर शनिवारी रात्री उशिरा चार वाजता वसई रोड रेल्वे स्थानकातून गोरखपूरच्या दिशेनं पहिली विशेष ट्रेन सोडण्यात आली. 22 डब्यांच्या या विशेष गाडीत एकूण 1200 प्रवासी होते. या प्रवासासाठी 740 रुपये तिकिट आकारण्यात आलं आहे.

मंगळवारपर्यंत राज्यातून 15 आणि बुधवारी रात्री 10 अशा 25 रेल्वेगाड्या आतापर्यंत कामगारांना घेऊन इतर राज्यात गेल्या असल्याची माहिती प्रधान सचिव डॉ नितीन करीर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली. चंद्रपूर आणि गडचिरोली येथे बाहेरील राज्यातून मजुरांना घेऊन मंगळवारपर्यंत 2 रेल्वे आल्या अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

special train for migrant worker might run from mumbai read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: काँग्रेसमधील गटबाजी उफाळली! पालिकेतील अपयशानंतर मुंबई अध्यक्ष हटवण्याची मागणी

Chha. Shivaji Maharaj Memorial : शिवरायांच्या स्मारकासाठी हरियाना सरकारचा शब्द; पानिपतच्या रणांगणावर मराठा शौर्याला सलाम

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे राजेंद्र राठोड यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

नेहा शितोळे, सोनाली पाटीलचा राकेशला पाठिंबा; म्हणाल्या "मी एक महिला असून.."

Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेची वसुली 'जागेवर' ठप्प! सरकारच्या स्थगितीमुळे ४० कोटींवरच अडकला आकडा

SCROLL FOR NEXT