मुंबई

परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; दहावी, बारावीची फेरपरीक्षा 20 नोव्हेंबरपासून

तेजस वाघमारे

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक आज (मंगळवार, ता.20 ) जाहीर केले आहे. 20 नोव्हेंबरपासून लेखी तर 18 नोव्हेंबरपासून तोंडी, प्रात्यक्षिक आणि श्रेणीविषयाच्या परीक्षा सुरू होणार आहेत.

दहावीची परीक्षा 5 डिसेंबरपर्यत तर बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रमाची परीक्षा 10 डिसेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. तसेच बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 7 डिसेंबरपर्यत सुरू राहणार आहे.

या विद्यार्थ्यांच्या तोंडी, श्रेणी आणि प्रात्यक्षिक परीक्षा शाळा, महाविद्यालय स्तरावर होणार असून दहावीच्या परीक्षा या 5 डिसेंबरपर्यंत तर बारावीच्या परीक्षा 10 डिसेंबरपर्यत घेण्यात येणार आहेत.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेले हे तात्पुरत्या स्वरूपात विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी असून शाळा, महाविद्यालयामधून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

इतर कोणत्याही माध्यमातून मिलळलेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये असे आवाहन ही राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आलंय.

( संपादन - सुमित बागुल ) 

ssc and hsc re exams timetable published by maharashtra ssc board 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

SCROLL FOR NEXT