farmer 
मुंबई

'राज्य सरकारकडून येणे' असं लिहून ठेवा, पण शेतकऱ्यांना कर्ज द्या..राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय..  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: खरीप हंगामाच्या तोंडावर थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 'राज्य सरकारकडून येणे' दाखवून बँकांनी त्यांना खरीप हंगामासाठी नव्याने पीक कर्ज द्यावे, असे स्पष्ट निर्देश सरकारनं दिले आहेत. 

जिल्हा बँका तसंच व्यापारी आणि ग्रामीण बँकांना उद्देशून तसा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना हंगामासाठी पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  राज्यभरातल्या सुमारे अकरा लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता आणि तशी योजना जाहीर केली होती. पात्र शेतकऱ्यांचं यादीत नाव आलं मात्र लॉकडाऊनमुळे कर्जखात्याचं प्रमाणीकरण थांबलं. सातबारावर कर्जाचा उल्लेख असल्यामुळे बँकांकडून अशा शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारण्यात येतंय.

त्यामुळे कर्जमाफीसोबत खरीपाचं पीक कर्ज वाटप कोरोनाच्या सावटाखाली सापडल्यामुळे सरकारनं थकीत कर्जाचा बोजा स्वतःच्या डोक्यावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज सरकार जमा असल्याचा उल्लेख करावा तसंच  यादीत नाव असलेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त समजा असे स्पष्ट निर्देश  निर्णयात देण्यात आले आहेत.

बँकांनी शेतकऱ्यांकडून येणे असणारी रक्कम शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावर ‘सरकारकडून येणे‘ असल्याचं दाखवून शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज द्यावे. याअंतर्गत थकीत कर्ज आणि त्यावरील व्याज अशा दोन्ही बाबी सरकारमार्फत दिल्या जाणार आहेत. शेतकऱयांना १ एप्रिल २०२० पासून कर्जाची रक्कम प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे.

state governement will give all loan of farmers read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT