मुंबई

ऑक्सिजनच्या मागणीत वाढ, आरोग्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

पूजा विचारे

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. अशातच कोरोना रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

या मागणीची तातडीनं दखल घेण्यात आली आहे. साथरोग नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करत वैद्यकीय प्राणवायू उत्पादन करणाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के प्राणवायू देण्याचे बंधनकारक करण्यात आलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी डिसेंबर २०२० पर्यंत राज्यात लागू असेल, असंही सांगण्यात आलं आहे.

याआधी उद्योग क्षेत्रासाठी ५० ते ६० टक्के आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ४० ते ५० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. मात्र आताच्या परिस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात कायद्यान्वये बदल करण्यात आला आहे. आता पुरवठ्याचे प्रमाण वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के तर २० टक्के उद्योगांसाठी करण्यात आलेय. यामुळे कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नसल्याची दक्षता घेण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

शरीरासोबत मनाची मशागत आवश्यकः आरोग्यमंत्री

सकारात्मकता आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपल्याला कोरोनासारख्या महामारीवर विजय मिळवायचा आहे.  कोरोनाने आपल्याला सुदृढ राहायला शिकवले. मात्र, शरिरासोबतच मनाचीही मशागत आवश्यक आहे. यातून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री यांनी केले.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवावी. योग्य आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम या सगळ्या गोष्टी कराव्यात. हंगामी सांसर्गिक आजार जसे डेंग्यू आणि मलेरिया यांवर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली हवी. यासाठी योग, प्राणायाम यांचेही खूप महत्त्व आहे. कोरोना काळात वाफ घेणे, गरम पाणी पिणे, काढा घेणे यासुद्धा महत्वाच्या बाबी असल्याचे त्यांनी सांगितले.

आता आपल्याला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैलीची सवय लावून घ्यावी लागेल. जिभेवर आणि मनावर ताबा ठेवूनच सदृढ आयुष्य जगता येईल. तसेच, या काळात जंक फुड खाण्यावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.  याकाळात लोकांना समुपदेश करणे हा महत्वाचा विषय आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांची नोकरी गेली. व्यवसाय ठप्प पडले. मात्र, याने खचून न जाता वाटचाल करत राहावी. यासाठी मनाची मशागत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

State Health Minister Rajesh Tope Take Decision For Corona Virus Patients oxygen

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT