मुंबई

विद्यार्थी सहामहिने आधीच होणार CA, दहावीनंतर लगेच प्रवेशासाठी करता येणार नोंदणी

तेजस वाघमारे

मुंबई : विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा यासह संस्थेशी जोडले गेल्यावर त्यांच्यात व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावीत या उद्देशाने इन्स्टिट्यूट ऑफ चाटर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) प्रवेश नोंदणीमध्ये महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता दहावीनंतर सीएसाठी नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आता सहा महिने अगोदर सीए होऊ शकतील.

CA करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी बारावीत गेल्यावर सीए साठी नोंदणी करता येत होती. मात्र आता दहावीनंतर नोंदणी करता येईल. यासाठी आयसीएआय संस्थेच्या कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. दहावीत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना फाउंडेशनची तयारी करण्यासाठी वेळ मिळणार आहे.

यानंतर ते बारावीनंतर फाउंडेशनची परीक्षा देऊ शकतात. त्यांचे प्रवेश बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरच निश्चित केले जाणार आहेत. दहावीत नोंदणी केल्यामुळे अकरावी आणि बारावीचा अभ्यास करत असताना त्यांचे ज्ञान अधिक वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर फाउंडेशनच्या परीक्षेला कसे सामोरे जायचे याचा आत्मविश्वासही निर्माण होणार आहे.

बारावी परीक्षेस पात्र झाल्यानंतर मे किंवा जून महिन्यात होणाऱ्या फाउंडेशन परीक्षेस हे विद्यार्थी पात्र ठरतील. फाउंडेशनची परीक्षा देण्यापूर्वी आवश्यक असलेला चार महिन्यांचा अध्ययन कालावधी हे विद्यार्थी अकरावी व बारावी या दोन वर्षांत त्यांच्या सोयीने पूर्ण करू शकतात. तसेच या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सहा महिने लवकर सीए पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

Students will be able to register for admission in CA immediately after 10th

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT