मुंबई

Taj Lands End हॉटेलमध्ये गणपती प्रतिष्ठापनेवरून वाद; मूर्ती कुठे गेली?

सकाळ डिजिटल टीम

२००७ पासून Taj Lands End हॉटेलमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. गेल्या वर्षी कोरोनामुळे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती.

मुंबईतील प्रसिद्ध Taj Lands End हॉटेलमध्ये गणपतीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेवरून वाद निर्माण झाला आहे. गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मूर्तीसह दोन तास गेटवरच उभा रहावं लागल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतरही कर्मचाऱ्यांकडून मूर्ती घेऊन व्यवस्थापनाने पुढे काय केलं हे माहिती नसल्याने आता हॉटेल व्यवस्थापन आणि कर्मचारी युनियनमध्ये वाद सुरु झाला आहे.

२००७ पासून Taj Lands End हॉटेलमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. गेल्या वर्षी कोरोनामुळे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मात्र यंदा मूर्ती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी आधी व्यवस्थापनाने केली होती. पण कर्मचारी जेव्हा मूर्ती घेऊन आले तेव्हा त्यांना गेटवरच अडवण्यात आलं. तब्बल दोन तास कर्मचारी मूर्तीसह उभा होते.

कर्मचाऱ्यांकडून मूर्ती दोन तासांनंतर व्यवस्थापनाने आपल्याकडे घेतली पण प्रतिष्ठापना केली नाही. तसंच मूर्ती कुठे नेऊन ठेवली हे माहिती नसल्याचं कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेवरून आता व्यवस्थापन आणि कर्मचारी युनियनमध्ये वाद सुरु आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनीही याबाबत व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला मोठं महत्त्व आहे. अशा महाराष्ट्रात गणपतीची मूर्ती अशी दोन तास बाहेर ठेवणाऱ्या हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई करावी असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT