Eknath Shinde
Eknath Shinde sakal media
मुंबई

"राजकारण न करता 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावी"

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : ठाणे जिह्यातील (thane) 14 गावे विकासापासून (village developments) गेली अनेक वर्षे वंचित आहेत. ही गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत (navi Mumbai municipal corporation) समाविष्ट व्हावीत अशी 14 गाव सर्व पक्षिय विकास समितीची मागणी आहे. त्यासाठी केलेले ठराव, प्रशासकीय यंत्रणांना केलेले पत्रव्यवहार पहाता ही गावे नवी मुंबईत (navi mumbai) जाण्यास कोणताही अडथळा नाही. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून समिती सदस्य नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची भेट घेण्याचा प्रयत्न करीत होते मात्र ती भेटही होत नव्हती.

अखेर सोमवारी समिती सदस्य आणि मंत्री शिंदे यांची भेट झाली आहे. यावेळी गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून नागरिकांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी समितीने शिंदे यांच्याकडे केली आहे. 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून 14 गाव सर्व पक्षिय विकास समिती पाठपुरावा करीत आहे. या मागणीसाठी 14 गावातील ग्रामपंचायत निवडणुकांवर देखील स्थानिकांनी तीनदा बहिष्कार टाकला आहे.

मात्र जनतेच्या मागण्या या शासन दरबारी धूळखात पडल्या आहेत. मागण्या मान्य होत नसल्याने समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मागत होती. मात्र त्यांना वेळच दिली जात नसल्याने समिती सदस्यांचे म्हणने आहे. अखेर सोमवारी समितीचे शिष्टमंडळाने पालकमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांना गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ठ करावी याविषयी निवेदन दिले.

तसेच गावात भेडसावणाऱ्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या. तसेच कोणतेही राजकारण न करता गावच्या विकासासाठी ही गावे महापालिकेत समाविष्ट करावीत असे समितीने निवेदनात म्हटले आहे.

"सोमवारी समिती मंडळाने पालकमंत्री शिंदे यांची भेट घेत गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावी अशी मागणी केली आहे. पालकमंत्र्यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. "

- लक्ष्मण पाटील, अध्यक्ष 14 गाव सर्वपक्षीय विकास समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT