mumbai sakal
मुंबई

तिसरी लाट येणं हे नागरिकांवर अवलंबून !

पुढील महिना महत्त्वाचा असल्याचा टास्क फोर्सचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील कोरोना (Corona) अद्याप गेला नसून कोरोनाच्या नव्या प्रकाराचे रुग्ण (Patient) अधूनमधून आढळत आहेत. त्यामुळे कोरोना (Corona) प्रतिबंधक उपाययोजनांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्यास तिसरी लाट (Third wave) लवकर येऊ शकते. त्यामुळे पुढील महिनाभराचा काळ महत्त्वाचा असल्याचे राज्य कोविड टास्क (Covid Task) फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे (Avinash Supe) यांनी स्पष्ट केले.

१५ ऑगस्टपासून मुंबईत दोन डोस घेतलेल्यांना देण्यात आलेली लोकल प्रवासाची सवलत ही नोकरी-व्यवसायाकडे पाहून देण्यात आली आहे. कामाव्यतिरिक्त लोकलने फिरण्यातून कोरोनाचा संसर्ग लाटेत रूपांतरित होऊ शकतो. दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. असे असले तरी सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. सध्याची वाढलेली गर्दी पाहता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ही गर्दी आमंत्रण ठरू शकते. त्यामुळे पुढील महिनाभर सणासुदीच्या काळात नागरिकांनी संयम बाळगणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. सुपे म्हणाले.

सणासुदीत खबरदारी महत्त्वाची

सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सात ते आठ जिल्ह्यांत अद्यापही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यातच आगामी गौरी-गणपतीसारख्या सणासुदीच्या काळात खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे डॉ. सुपे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT