मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर राज्य सरकार आणि प्रशासनाचे योग्य प्रकारे नियंत्रण आहे. त्यामुळे वांद्रेमध्ये घडलेल्या एका घटनेच्या आधारावर तातडीने सशस्त्र फौजा बोलविण्याची आवश्यकता नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले. संबंधित याचिकेवर कोणतेही निर्देश देण्यासही नकार दिला.
काही दिवसांपूर्वी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर हजारो स्थलांतरित मजुरांनी गर्दी केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर शहरात आपत्कालीन परिस्थिती असताना अशी घटना घडली आहे. यामुळे कोरोनाचा धोका अधिक निर्माण होऊ शकतो, असा दावा करणारी जनहित याचिका तीन स्थानिक रहिवाशांनी ऍड. राहुल तवानी यांच्यामार्फत केली आहे. तातडीने शहरात लष्कर तैनात करावे, सशस्त्र फौजांबाबत अहवाल दाखल करावा, वांद्रे घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशा मागण्या याचिकेत केल्या आहेत.
न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्यापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे आज सुनावणी झाली. याचिकेवर कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. केवळ वांद्रेमध्ये घडलेल्या गर्दीच्या एका घटनेवरून तातडीची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा अंदाज लावता येणार नाही. आणि अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याची पुरेशी खबरदारी राज्य सरकार आणि प्रशासन घेईल याची खात्री आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे तातडीचे नसून नियमित न्यायालयात त्यावर सुनावणी होऊ शकते, त्यामुळे तातडीने दिलासा देण्याची मागणी नामंजूर होत आहे, असे खंडपीठाने सुनावले. रेल्वे सुरू होणार, या अफवेतून शेकडो मजुरांनी वांद्रेमध्ये गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.