BJP MLA 
मुंबई

BJP MLA: भाजपचे तीन आमदार अडकले लिफ्टमध्ये, संकटमोचक पुन्हा मदतीला धावले

Sandip Kapde

BJP MLA:  भाजपची कार्यशाळा आज मुंबईत पार पडली. यावेळी भाजपचे तीन आमदार लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले हे लिफ्टमध्ये अडकले होते. यावेळी भाजपचे संकटमोचक पुन्हा मदतीला धावले.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांच्या मदतीने तिन्ही आमदारांची सुटका करण्यात आली. लिफ्टचा दरवाजा वाकवत महाजन यांनी आमदारांना बाहेर काढले. लिफ्टमध्ये अस्वस्थ आमदार म्हात्रे यांना दरेकरांनी आधार दिला. 

भिवंडीत एका रिसॉर्टमध्ये कार्यशाळा होती. यावेळी ही घटना घडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. आज राज्यभरातील महत्त्वाच्या नेत्यांची कार्यशाळा पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कार्यशाळा गोपनीय व्हावी म्हणून खबरदारी घेतली.

तसेच भाजपच्या महाविजय कार्यशाळेत "मोठं कुटुंब, सुखी कुटुंब"चा नारा देण्यात आला. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा नारा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे आवाहन नेत्यांना करण्यात आले. शेलार यांनी प्रशिक्षण वर्गात ही  मांडणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT