mumbai
mumbai  
मुंबई

दिलासादायक! मुंबईत आजपर्यंत तब्बल 'इतके' रुग्ण झाले बरे..जाणून घ्या आजची कोरोनाची आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई:  मुंबईत कोरोना बाधित रुग्णांनी आजही हजारचा आकडा पार केला आहे. आजही 1044 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 33,835 झाली आहे. रुग्णांच्या दगावण्याचे प्रमाण देखील कमी व्हायचे नाव घेत नाहीये.  आज ही 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 1097 झाली  आहे. मात्र बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल ९ हजारांवर पोहोचली आहे.             

 मुंबईत रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. आज 240 रुग्ण बरे झाले असून बरे होऊन सुखरूप घरी गेलेल्यांची संख्या 9054 झाली आहे.  मुंबईत आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 1097 वर पोचला आहे. 

आज झालेल्या 32 मृत्यूंपैकी 15 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 19 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी तिघांचे वय 40 च्या खाली आहे. तर 12 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. तर 17 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.   

आतापर्यंत ९ हजार रुग्ण झाले बरे:

संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण 893 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 27,715 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज 240 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 9054 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

till now 9000 corona patients discharged in mumbai read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT