मुंबई

गोरगरिबांची सणाला आबाळ

CD

गोरगरिबांची सणाला आबाळ
जिल्ह्यात रेशनधान्याचा तुटवडा, आनंदाचा शिधा शासनाकडून बंद
महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : पावसाळ्यात रेशनधान्य आणण्यासाठी जाता येत नसल्याने राज्य शासनाने तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच वितरित केले होते, पण जिल्ह्यातील रेशनधान्याचा साठा आता संपला. अशातच यंदा आनंदाचा शिधापण दिला जाणार नसल्याने ऐन गौरी-गणपतीच्या सणातच गोरगरिबांची आबाळ होणार असल्याचे चित्र आहे.
दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना १०० रुपयांत सणानिमित्ताने आनंदाचा शिधा वितरित केला जातो. या शिधामध्ये रवा, साखर, चणाडाळ, पामतेल, मैदा अशा पाच जिनसा दिल्या जातात. कोकणात गौरी-गणपतीच्या सण महत्त्वाचा असल्याने तीन वर्षांपासून आनंदाच्या शिधा किटचे वाटप केले जाते. येथील गोरगरीब कुटुंबीय किटच्या वितरणाची वाट पाहात असतात; परंतु शिधा वाटप केला जाणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून दिली जात आहे. ऑगस्टमध्ये मोफत शिधा मिळणार नाही. जुलै, ऑगस्टचा मोफत शिधा जुनमध्ये वाटण्यात आलेला आहे. त्यामुळे रेशनिगंचे स्वस्त धान्य मिळणार नसल्याने गोरगरिबांची सणासुदीला गैरसोय होणार आहे.
------
धान्यवाटपात गोंधळ
तीन महिन्यांचा एकत्र शिधावाटपाची जिल्ह्यात पुरेशी यंत्रणा नाही. धान्य एकत्र साठवण्याची गोदामांची कमतरता, वाहतुकीसाठी अपुरी वाहने, दुकानांमध्ये धान्य साठवण्यासाठी अपुरी जागा अशा विविध समस्यांमुळे धान्यवाटपात गोंधळ उडाला होता. १३ जूनपर्यंत १५.२ टक्के वितरण झाले होते. ऑगस्टपर्यंत फारशी सुधारणा झाली नव्हती. तरीही १०० टक्के वितरण झाल्याचा दावा पुरवठा विभाग करत आहे, पण पुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना बसत आहे.
------
२१ गोदामे सुस्थितीत
जिल्ह्यात १,४५२ रेशनधान्य दुकाने आहेत. कमीत कमी जागेतील या दुकानांमध्ये साठवणुकीची सुविधा नाही. १० बाय १० फुटांच्या दुकानातच धान्यविक्री करतात. अशा परिस्थितीत तीन महिन्यांचे धान्य साठवून ठेवणे, शक्य होत नाही. काही दुकाने जीर्ण इमारतीमध्ये असल्याने पावसाळ्यात गळती लागून धान्य खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दुकानदार धोका पत्करण्यास तयार नाहीत. पुरवठा विभागाची जिल्ह्यात ६६ गोडाऊन आहेत, परंतु त्यापैकी फक्त २१ गोदामे सध्या सुस्थितीत आहेत.
--------
धान्य वितरणाचे विश्लेषण
अंत्योदय : ८०,६०२ शिधापत्रिका
प्राधान्य कुटुंब : ३,७५,४२६ शिधापत्रिका
एकूण शिधापत्रिका ः४,५६,०२८
------
गौरी-गणपतीचा उत्सव गोरगरिबांपासून श्रीमंतांच्या घरात साजरा केला जातो. सणासाठी आनंदाचा शिधा मिळावा, अशी अपेक्षा असते. शासनाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून तीन महिन्यांचे धान्य एकदाच वाटले. आता आनंदाचा शिधा मिळणार नाही, असेही जाहीर केले आहे. या निर्णयाचा फटका गोरगरिबांना बसत आहे.
- प्रमोद घोसाळकर, अध्यक्ष, रायगड जिल्हा रास्त भाव दुकानदार कल्याणकारी संघटना
----
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे तीन महिन्यांचे १०० टक्के धान्यवाटप झालेले आहे. सप्टेंबरमध्ये धान्यवाटप गणपती सणानंतर केली जाणार आहे. आनंदाचा शिधा यंदा गौरी-गणपतीच्या सणासाठी करण्याचे कोणतेही नियोजन नाही.
- सर्जेराव सोनावणे, जिल्हा पुरवठा अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT