मुंबई, ता. १६ : राज्यातील दुसऱ्या टप्प्याच्या शिक्षक भरतीची प्रक्रिया वादात सापडली आहे. कारण यासाठी वापरलेले पवित्र पोर्टलमध्येच अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याने भरतीला खीळ बसल्याचा आरोप शिक्षक आमदार विक्रम काळे, जयंत तासगावकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, ज. मो. अभ्यंकर यांनी केला आहे.
पवित्र पोर्टलमधील त्रुटींमुळे राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत अनेक प्रकारच्या येत असलेल्या अडचणींवर आज विधान परिषदेत शिक्षक आमदार जयंत तासगावकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह शिक्षक आमदारांनी पवित्र पोर्टल होणाऱ्या अडचणींची माहिती दिली. उमेदवारांचे पसंतीक्रम, कोणत्या जिल्ह्यातील संस्था पाहिजे याचा विचार केला जात नसल्याने मुलाखतीदरम्यान तब्बल ३० ते ४० टक्के उमेदवार गैरहजर राहत आहेत. त्यात पवित्र पोर्टलमधील त्रुटीमुळे तब्बल ५० टक्क्यांहून अधिक जागा भरल्या जात नाहीत. यामुळे भरती प्रक्रियेला खीळ बसली असून शालेय शिक्षण विभागाने पूर्वीप्रमाणे शिक्षण संस्थांकडे भरतीची प्रक्रिया दिली जावी, तसेच तूर्तास पवित्र पोर्टलमधील त्रुटी दूर करून पुढील महिन्यामध्ये ही भरती सुरू करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
----------------------------------
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीत. उच्च न्यायालयाने भरती प्रक्रिया नि:पक्षपातीपणाने झाली पाहिजे, असे सांगितले होते; मात्र त्याचा वेगळा अर्थ काढताना पवित्र पोर्टल आणले गेले. त्याच्यामध्ये अनेक दोष आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया रखडत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणल्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.