मुंबई

एल्फिन्स्टन रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद

CD

एल्फिन्स्टन रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद

६० हजार वाहनांचा ताण तीन मार्गांवर येणार

मुंबई, ता. १२ : अटल सेतूला वांद्रे-वरळी सी-लिंकशी जोडण्यासाठी वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून नव्‍याने बांधण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून दोन वर्षे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल बंद झाल्यामुळे या पुलावरील सुमारे ६० हजार वाहने दादर येथील टिळक पूल, लालबाग येथील भारतमाता पूल आणि करी रोड पुलावर वळविण्यात येणार असल्याने या मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढून वाहतूक कोंडी हाेणार आहे.

एल्फिन्स्टन पूल बुधवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्याची अधिसूचना वाहतूक पाेलिसांनी काढली हाेती; मात्र त्याला पुन्हा स्थानिक रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेऊन आधी पुनर्वसन करा; मगच पूल तोडा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पूल बंद करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाेबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढल्यानंतर शुक्रवारी १२ नंतर वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुलाचे काम हे आठ ते सहा महिन्यांत होणे अपेक्षित आहे; परंतु प्रशासनाकडून दिरंगाई केली जाते. सहा महिन्यांच्या कामाला दोन वर्षांचा वेळ सांगितला जातो. एवढ्या कालावधीतही हे काम पूर्ण होत नाही. कोणत्याही पुलाचे पाडकाम करताना प्रशासनाकडून वेळापत्रक तयार करायला हवे. कोणत्या कामाला किती वेळ लागेल, याबाबतची माहिती सर्वसामान्यांना मिळायला पाहिजे, असे वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार म्हणाले. या पुलाच्या पाडकामामुळे टिळक पूल, करी रोड पूल आणि भारतमाता पूल या मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढणार आहे. कोणत्याही पुलाचे पाडकाम करताना वाहतूक पोलिस, रेल्वे प्रशासन, महापालिका, बेस्ट यांनी नियोजन करणे अपेक्षित आहे. त्याबाबतच्या परवानग्या लवकर मिळाल्या पाहिजेत; पण यंत्रणाकडून गांभीर्याने काम केले जात नाही. आठ ते दहा दिवसांच्या परवानग्यांसाठी कित्येक महिने लागतात, त्यामुळे आणखी उशीर होतो. काही पुलांवरती वाहनांचा ताण वाढत असेल, तर तेथील सार्वजनिक वाहतूक सेवा जास्तीत जास्त उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बसच्या जागेत तीन ते चार कार उभ्या राहतात; पण बसमध्ये एका कारच्या दहा पट लोक प्रवास करू शकतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे, असेही दातार म्हणाले.
==
एल्फिन्स्टन पुलावरून दिवसाला साधारण ५० ते ६० हजार वाहनांची ये-जा असते. हा पूल बंद झाल्याने या मार्गावरील वाहने टिळक पूल, भारतमाता पूल आणि करी रोड पूल येथे वळविण्यात येणार आहेत. टिळक पुलावर ८० हजार ते एक लाख वाहनांची ये-जा असते, भारतमाता पुलावर ५० ते ६० हजार वाहनांची ये-जा असते आणि करी रोड पुलावर ५० ते ६० हजार वाहनांची ये-जा असते. त्यातच आणखी ५० ते ६० वाहनांची भर पडल्याने तिन्ही पुलांवरील वाहतुकीचा ताण वाढणार आहे.
- डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ

----------------

१००हून अधिक विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी एल्फिन्स्टन रेल्वे पूल पाडण्यात येणार असल्यामुळे त्याखाली व्‍यवसाय करणाऱ्या १००हून अधिक विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड काेसळणार आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही जगायचे कसे, असा सवाल या विक्रेत्यांकडून विचारला जात आहे.
===
केईएम रुग्णालय, टाटा रुग्णालय आणि वाडिया रुग्णालयात जाणारे प्रवासी शेअर टॅक्सीने जातात. येथे ४० टॅक्सीचालकांचे घर यावर चालते. पूल बंद झाल्याने प्रत्येक टॅक्सीचालकाला १५०० रुपयांचे नुकसान होणार आहे.
- संतोष साळुंके, टॅक्सीचालक
==
३० वर्षांपासून आम्ही येथे व्यवसाय करत आहाेत. आधी सासू आणि त्यानंतर माझे पती हा व्यवसाय करत होते. १४ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाल्यानंतर मी व्यवसाय करते. त्यावरच आमचे घर चालत आहे. हा पूल बंद केल्यानंतर ४०० ते ५०० रुपयांचा फटका बसणार आहे.
- भावना परब, विक्रेता
==
एल्फिन्स्टन पूल बंद केल्यास चालायला रस्ता नसल्याने लोक येणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांवर परिणाम होईल. रोज ५०० ते १००० रुपयांवर पाणी साेडावे लागणार आहे.
- संगीता सोनावणे, विक्रेता
----------
६० वर्षांपासून एल्फिन्स्टन पुलाखाली फळविक्रीचा व्यवसाय करत आहे. पूल बंद केल्यास ग्राहकही कमी होणार आहेत. दररोज १००० रुपयांचे नुकसान होणार आहे.
- सुभाष तांबे, विक्रेता
==
गेल्या १३ दिवसांपासून केईएम रुग्णालयात येथे उपचारासाठी येत आहे. माझ्या पायाला संसर्ग झाला आहे. उपचारांसाठी आणखी दोन महिने या वेळी लागणार आहेत. हा पूल बंद झाल्यास गैरसोय होणार आहे.
- सुरेंद्र राय, रुग्ण
===
रुग्ण आणि नातेवाइकांचे हाल
केईम रुग्णालय, टाटा रुग्णालय आणि वाडिया रुग्णालयात जाण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना १० रुपयांत शेअर टॅक्सीने जाता येत होते. आता टॅक्सी करून जावे लागणार आहे. त्यामुळे २२ रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.
==

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs SA : नुसता धुरळा... Phil Salt चे वेगवान T20I शतक अन् जॉस बटलरच्या १५ चेंडूंत ७४ धावा; इंग्लंडचा रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर, मोडला भारताचा विश्वविक्रम

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

SCROLL FOR NEXT