गणेश विसर्जनाच्या गर्दीचे
एआयमुळे नियोजन शक्य!
मुंबई पोलिसांचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः यंदाच्या गणेशमूर्ती विसर्जन सोहळ्याच्या बंदोबस्तात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेची कास धरल्याने गिरगाव चौपाटीवर दिवसभरात हजेरी लावणाऱ्या तब्बल २० लाख भाविकांच्या गर्दीचे सहज नियोजन करण्यात पोलिसांना यश आले. इतकेच नव्हे तर गिरगाव चौपाटीसह अन्य प्रमुख विसर्जनस्थळी मार्गस्थ मिरवणुका, विसर्जन स्थळांशेजारील पार्किंग व्यवस्थेपासून निर्माल्य कलशांपर्यंत प्रत्येक ठिकाणचा गस्त, पहाराही सुलभतेने पार पाडता आला, असा दावा पोलिसांनी केला आहे.
परिमंडळ-२चे उपायुक्त मोहित गर्ग यांनी बुधवारी पोलिस दलातील एआय प्रणालीचे फायदे विशद केले. यंदा अनंत चतुर्दशीला सकाळपासून दुसऱ्या दिवशी लालबाग राजाचे विसर्जन होईपर्यंत सुमारे २० लाख भाविक गिरगाव चौपाटीवर येऊन गेले. चतुर्दशीच्या संध्याकाळी एकाच वेळी सुमारे चार लाख भाविक चौपाटीवर होते. उभारण्यात आलेल्या १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना एआयप्रणाली जोडण्यात आली होती. त्यामुळे गर्दी अपेक्षित मर्यादेच्या बाहेर गेल्यास अलर्ट मिळत होते. चौपाटीच्या कोणत्या भागात गर्दी अधिक झाली, कोणत्या भागात ती वळवणे शक्य आहे याची माहिती मिळत होती.
----
२४ लहान मुलांचा शोध
एआयच्या मदतीने विसर्जनावेळी बेपत्ता झालेल्या २४ लहान मुलांचा शोध लावण्यात आला. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ७५० सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांचेही एआयद्वारे नियोजन करण्यात आले. मंडळांच्या वाहनांवर आरएफआयडी, जीपीएस प्रणाली बसवून मिरवणुकीचे लोकेशन, सहभागी गर्दी, मार्गावरील वाहनांची रहदारींची माहिती मिळाल्याने कोठेही कोंडी झाली नाही, असा दावा गर्ग यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.