मुंबई

फेसलेस पद्धतीने काढलेल्‍या शिकाऊ वाहन परवान्याचा गैरफायदा

CD

फेसलेस पद्धतीने काढलेल्‍या शिकाऊ वाहन परवान्याचा गैरफायदा
सेवेला तात्पुरती स्थगिती देण्याचे परिवहन विभागाचे पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः फेसलेस पद्धतीने काढलेल्या शिकाऊ वाहन परवान्याचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फेसलेस शिकाऊ परवाना पद्धत काढण्याच्या प्रक्रियामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी फेसलेस शिकाऊ वाहन परवाना प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती द्यावी, असे पत्र परिवहन विभागाने एनआयसीला दिल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
सरनाईक म्हणाले, की बारावी पास झालेली १८ वर्षे पूर्ण झालेली मुले अशा पद्धतीने शिकाऊ वाहन परवाना प्राप्त करतात. तथापि, शिकाऊ वाहन परवाना चालकासोबत एक कायमस्वरूपी वाहन परवाना प्राप्त व्यक्ती असणे गरजेचे आहे; परंतु या सर्व नियमांना फाटा देत काही तरुण-तरुणींनी बेदरकार वाहन चालवून अपघात घडवून आणल्याची अनेक उदाहरणे आहेत. याबरोबर ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी अपघात केलेल्या अनेक प्रकरणांमध्ये संबंधित चालकाकडे केवळ शिकाऊ परवाना असल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे. अशा गंभीर बाबींना आळा घालण्यासाठी फेसलेस शिकाऊ वाहन परवाना देण्याची पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : बीडच्या नांदूर हवेली गावातून 36 जणांची सुखरूपरित्या बाहेर काढलं

Navratri 2025 : दुर्गा मातेला अत्यंत प्रिय आहेत या 5 राशी; तुमची रास आहेत का यात ?

New York पोलिसांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा ताफा थांबवला; Donald Trump यांना फोन केला अन्..., काय घडलं? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: भाजप आणि काँग्रेस आक्रमक, एकमेकांविरोधात गुन्हा दाखल; साडी प्रकरणाने राजकीय वातावरण तापले

Sharad Pawar : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभा करा; बळीराजा वाचला नाही, तर राज्यावर मोठे संकट येईल

SCROLL FOR NEXT