मुंबईत मृत्यूपश्चात ३९वे अवयवदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईत मृत्यूपश्चात ३९व्या अवयवदानाची नोंद बुधवारी (ता. १७) झाली. नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५९ वर्षीय पुरुष रुग्णाला मेंदूमृत घोषित करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या वेळी यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. सप्टेंबरमधील हे पाचवे अवयवदान ठरले आहे. राज्य सरकारने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झेडटीसीसीच्या समन्वयातून अवयवांचे वितरण प्रत्यारोपणासाठी करण्यात आले. अवयवदानाचे महत्त्व समजून व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुलीने आपल्या वडिलांचे अवयवदान केले. या निर्णयामुळे तिघांचे प्राण वाचवण्यात यश आले. नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर चारमध्ये राहणारे ५९ वर्षीय उमेद सिंह कन्याल हे गेल्या रविवारी एका अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांदरम्यान त्यांना मेंंदूमृत घोषित केले. दंतचिकित्सक मुलगी श्रेया यांनी वडिलांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेत यकृत आणि मूत्रपिंड दान करीत तिघांना नवजीवन देण्यात हातभार लावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.