मुंबई

नरिमन पॉईंट ते मिरा-भाईंदर प्रवास होणार सुसाट

CD

नरिमन पॉइंट ते मिरा-भाईंदर प्रवास होणार सुसाट
मिठागराची जमीन राज्य सरकारला हस्तांतरित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : ‘केंद्रीय मिठागर मंत्रालयाने आपल्या ताब्यातील जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे येत्या तीन वर्षांत हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते मिरा-भाईंदर हे अंतर किनारी मार्गे (कोस्टल रोड) केवळ अर्ध्या तासात कापता येईल,’ अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी (ता. २१) दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘गेली चार ते पाच वर्षे सातत्याने केंद्रीय मिठागर मंत्रालय व राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे दहिसर-भाईंदर ६० मीटर रस्त्यामधील ५३.१७ एकर जागा केंद्रीय मिठागर मंत्रालयाने राज्य शासनाच्या माध्यमातून मिरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतर करण्याची मान्यता दिली आहे. त्यामुळे दहिसर ते भाईंदर आणि पुढे वसई-विरारकडे जाणारा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नरिमन पॉइंट ते मिरा-भाईंदर हे अंतर आता कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासावर आले आहे.’
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून किनारी मार्गाचा विस्तार उत्तनपर्यंत केला जाणार आहे. तेथून दहिसर-भाईंदर हा ६० मीटर रुंदीचा रस्ता मिरा रोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत व तेथून वसई-विरारला जोडला जाणार आहे. या रस्त्याची निविदा प्रक्रिया यापूर्वीच काढण्यात आली आहे. हे काम एल अँड टी ही कंपनी करणार असून, पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यासाठी येणारा तीन हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे.

..
कोळीबांधवांच्या मागणीचा विचार
उत्तन येथून जाणाऱ्या किनारी मार्गाला स्थानिक कोळीबांधवांनी विरोध केला होता, त्यांच्या विविध मागण्या प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. दरम्यान, उत्तन येथील कोळीबांधवांच्या रास्त मागणीचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार केल्याचे या वेळी प्रताप सरनाईक यांनी सांगितले. भविष्यात या मार्गामुळे मिरा-भाईंदर हे मुंबईशी अधिक जोडले जाईल, तसेच हे शहर लवकरच मुंबई शहराचे नवे उपनगर म्हणून आपली ओळख निर्माण करेल, असा विश्वास परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: अभिषेक शर्मा - शुभमन गिलच्या वादळाने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; भारताचा सुपर फोरमध्ये पहिला विजय

IND vs PAK, Video: सुर्यकुमार यादवचा जुगाड! 'गार्डन'मध्ये फिरणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाला चतुराईने केले बाद

IND vs PAK Video: दोनदा चूक झाली, पण तिसऱ्यांदा अफलातून कॅच घेत अभिषेक शर्माची गर्जना; आक्रमक खेळणारा सैम आयुब कसा झाला आऊट?

Pune: गोधड्या धुण्यासाठी गेले, पाण्यात अनेकजण अडकले, तरुणांनी धाडस दाखवलं अन्...; खडकवासलातील थरारक प्रसंग

IIM Centre: 'आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात';राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला मंजुरी; २०२६ पासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार

SCROLL FOR NEXT