ठाणे, नवी मुंबईतून येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी
केवळ रात्री सहा तास मुभा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : शहरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबईतून येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत प्रवेशबंदी असणार आहे. केवळ रात्री सहा तास प्रवेशास मुभा असेल.
ठाणे, नवी मुंबईतून येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत प्रवेश बंद केलेला आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबईकडून आनंदनगर चेकनाका मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या सर्व १० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त चाकांच्या वाहनांना कोपरी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत आनंदनगर चेक नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही बंदी २ ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. ठाणे व नवी मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना ऐरोली चेकनाका येथे प्रवेश बंद असेल. यात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळली आहेत. नवी मुंबईकडून येणाऱ्या मुंबई शहरात प्रवेश करून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाशी चेकनाका येथे प्रवेशबंदी असेल. यातही अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.