मुंबई

भारताचे चरित्र आणि चारित्र समजून घेणे अत्यावश्यक

CD

भारताचे चरित्र आणि चारित्र्य समजून घेणे अत्यावश्यक
‘भारत’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. सदानंद मोरे यांचे वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिर येथे ‘भारत’ या हर्षद माने लिखित पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. १५) करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी भारताचे चरित्र आणि चारित्र्य सखोलपणे समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘आपला देदीप्यमान इतिहास, संस्कृती आणि मूल्यव्यवस्था जाणून घेण्यासाठी उपलब्ध दर्जेदार साहित्याचा अभ्यास अनिवार्य आहे,’ असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.


डॉ. सदानंद मोरे यांनी ‘भारत’ या पुस्तकाच्या वैशिष्ट्यांवर भाष्य करताना सांगितले, की ‘भारत’ वाचताना प्राचीन भारताचा विस्तृत पट डोळ्यांसमोर उभा राहतो. शुंग, मौर्य आणि सातवाहन युगाचा विस्तार, कालीदासाचे नाट्यकाव्य, प्राकृत व मराठी भाषेचा विकास तसेच आशिया-युरोप व्यापारमार्गातील बदल याचे अनुशीलन पुस्तकात प्रभावीपणे आले आहे. भारताच्या घडणीत महाराष्ट्राचा वाटा काय, हा विचारही पुस्तक वाचकांसमोर स्पष्ट ठेवते. यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ पत्रकार आणि पुरातत्त्वज्ञ विनायक परब यांनी भारतीय युद्धशास्त्रावर, डॉ. अनिता राणे कोठारे यांनी भारतीय कला व स्थापत्यावर, तर डॉ. मंजिरी भालेराव यांनी नाणी व शिलालेखांच्या आधारे भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकला. या वेळी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरखेल रघुजीराजे आंग्रे यांनी कोकणातील समुद्री किल्ल्यांचे महत्त्व, तसेच आगरी, भंडारी, कोळी समाजाचा स्वराज्य उभारणीत झालेला सहभाग यावर प्रकाश टाकला. ‘पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यांच्याशी झालेला सामना या किनारी समाजांच्या सहकार्यामुळे शक्य झाला,’ असे त्यांनी नमूद केले.

विनायक परब यांनी व्यापाराच्या इतिहासावर भाष्य केले. ‘हडप्पा संस्कृतीत शंभर टक्के व्यापाराचे उल्लेख आढळतात. परंतु व्यापारी मार्गांना संरक्षण नसते तर हा व्यापार शक्यच झाला नसता,’ असे त्यांनी सांगितले. बौद्ध व जैन भिक्षूंसह व्यापारी सागरी मार्गाने जगभर गेले; मात्र त्यांच्यासाठी संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. पुढे परब म्हणाले, ‘आपल्याकडे प्राचीन लिखित संदर्भ कमी मिळतात; मात्र ग्रीक साहित्यामध्ये आपल्या समुद्री व्यापाराचे उल्लेख सापडतात.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

SCROLL FOR NEXT