मुंबई

मुंबईत सरासरी ५० टक्के मतदान

CD

मुंबईत सरासरी ५० टक्के मतदान
२०१७च्या तुलनेत टक्का घसरला
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १५ : महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५० टक्के मतदान झाल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. २०१७च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी जवळपास पाच टक्क्यांनी घसरली असून, त्यामुळे निकालाचे पारडे कोणत्या दिशेला झुकणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
​मतदानाला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाल्यानंतर अनेक प्रभागांमध्ये मतदारांचा मोठा उत्साह दिसला. सकाळी ९.३०पर्यंत ६.९८ टक्के मतदान झाले. दुपारी १.३०पर्यंत सरासरी २९.९६ टक्के मतदान झाले; मात्र त्यानंतर मतदानाचा वेग काहीसा मंदावला होता. दुपारी ३.३० वाजल्यानंतर पुन्हा एकदा मतदारांनी गर्दी केल्याने संध्याकाळी ५.३०पर्यंत सरासरी ५० टक्के मतदान झाले.
----
कुठे अधिक, कुठे कमी?
भांडुप, मुलुंड, विलेपार्ले, मरोळ, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, दहिसर आणि बोरिवली भागात ४५ ते ५० टक्के मतदान झाले, तर माटुंगा, माहीम, घाटकोपर, मालाड, अंधेरी आणि कुलाबा येथे सरासरी ३० ते ३५ टक्के मतदान झाले.
---
​मागील निवडणुकीतील मतटक्का
​२०१२ : ४४.७५ टक्के
​२०१७ : ५५.५३ टक्के
​२०२६ : ५० टक्के (अंदाजे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live: सत्ता कुणाची? महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल आज, राजकीय भवितव्य ठरणार

Indian Coast Guard Operation Video: तटरक्षक दलाची मोठी कारवाई! अरबी समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करणाऱ्या नऊ पाकिस्तानीना पकडलं!

Indian Evacuation from Iran : इराणमधील संकटात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमाने सज्ज; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT