मुंबई

वातावरण बदलाचा आंब्याला फटका

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : अवकाळी पडलेला पाऊस, त्यानंतर वाढलेले तापमान याचा विपरीत परिणाम आंब्यावर झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे रायगड जिल्ह्यात फळधारणेपूर्वीच मोहर गळू लागला आहे. त्यामुळे २५० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता असल्याने बागायतदार धास्तावले आहेत.
रायगड जिल्ह्यातील ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली जाते. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रीक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदा मुबलक पाऊस आणि थंडी पडल्याने आंबा पीक चांगले येईल, अशी अपेक्षा बागायतदारांना होती. परंतु, अवकाळी पाऊस, तापमान वाढीमुळे फळ गळतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रोहा, मुरुड, श्रीवर्धन, तळा तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झाले असून आंबा उत्पादनात मोठी घट होईल, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
---------------------------------------
शेतकऱ्यांवर संकटाची मालिका
दरवर्षी आंब्याला ऑक्टोबर महिन्यात पालवी येण्यास सुरवात होते. जानेवारी महिन्यात या पालवीला मोहर येण्याची प्रक्रीया सुरु होते. यंदा ही प्रक्रीया उशिरा सुरु झाली. एकूण उत्पादन क्षम क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर मोहर आला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून कोकणातील आंबा बाजारात मुबलक प्रमाणात दाखल होण्यास सुरवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आंबा तयार होण्याच्या स्थितीत असतानाच अवकाळी पावसासोबत तापमान वाढीमुळे पीक नष्ट होण्याची भीती बागायतदारांना वाटत आहे.
-------------------------------------
अवकाळी पाऊस आणि त्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे उशिराने आलेला मोहर गळून पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात बदलत्या हवामानाचा २५० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकावर परिणाम होऊ शकतो. नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी तलाठी किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
-डी.एस.काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड
-------------------------------
पावसापेक्षा उष्णतेचा मोठा फटका पिकावर झाला आहे. या उष्णतेमुळे नव्याने आलेला मोहर तग धरु शकला नाही. फळधारणा होत असतानाच हे संकट ओढावले असल्याने अर्ध्याहून अधिक पीक वाया जाणार आहे.
-सदानंद पाटील, आंबा बागायतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT