मुंबई

ठाणे जिल्ह्यात अवैद्य रेती उपसावर कारवाई

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून मुंब्रा, भिवंडी, कल्याण आदी खाडीकिनारी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या रेतीउपसा करण्यात येत आहे. या विरोधात ठाणे जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत ठिकठिकाणी कारवाई करीत १९ सक्शन पंप, १६ बार्जसह रेती हौदांवर कारवाई करीत चार कोटी २५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून दोन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ठाणे, कल्याण आणि भिवंडी खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैद्य रेतीउपसा सुरू असल्याबाबात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेतीबंदर, कोण कशेळी काल्हेर, कोपर ते मोठागाव ठाकुर्ली रेती बंदर, पारसिक रेतीबंदर, कल्याण रेती बंदर, कशेळी खाडीपात्र, मोडक सागर धरण, उल्हास नदी खाडीपात्र आदी विविध ठिकाणी स्थानिक तहसीलदार विभागाच्या माध्यमातून अवैद्य रेतीउपशावर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. या कारवाईत १९ सक्शन पंप, १६ बार्ज, ५७ ब्रास रेती नष्ट- जप्त करण्यात आली; तर ६८ रेती हौद व कुंड्या नष्ट करण्यात आल्या. दोन करेन, दोन इंजिन यासह सात बोटी असा ४ कोटी २५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तसेच दोन जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT