Mumbai
Mumbai sakal
मुंबई

Mumbai : यंदा पावसाळ्यात ५२ दिवस भरतीचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : यंदाच्या पावसाळ्यातील ५२ दिवस हे मोठ्या भरतीचे असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या काळात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साठण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा सतर्क ठेवली जाणार आहे. नागरिकांनीही या भरतीच्या दिवसाची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन योजनेचा भाग म्हणून पावसाळ्यातील चार मीटरपेक्षा मोठ्या भरतीचे दिवस जाहीर करण्यात येतात. यंदा जून ते सप्टेंबर या काळात ५२ दिवस मोठ्या भरतीचे आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपूरे यांनी दिली. यामध्ये जून महिन्यात १३ दिवस, जुलै महिन्यात १४ दिवस, ऑगस्ट महिन्यात १४ दिवस, तर सप्टेंबर महिन्यात ११ दिवस असे ५२ दिवस मोठ्या भरतीचे आहेत.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने भरतीचे हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या भरतीच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
भरतीचे दिवस
जून : ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १७, १८, १९, २०, २१, २२
जुलै : २, ३, ४, ५, ६, ७, ८, १७, १८, १९, २०, २१, २२, ३१
ऑगस्ट : १, २, ३, ४, ५, ६, १६, १७, १८, १९, २०, २९, ३०, ३१
सप्टेंबर : १, २, ३, ३, १५, १६, २७, २८, २९, ३०, ३०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT