मुंबई

वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

CD

प्रसाद जोशी, वसई

शहरांतील वाढते प्रदूषण, वातावरणात होणारे बदल, पर्यावरणाचा असमतोल पाहता निसर्गच मानवाचे सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी संजीवनी ठरणार आहे. विकासाच्या नावावर मोठमोठे प्रकल्प अनेकदा निसर्गाला आव्हान देत असतात. त्यामुळे हवामानावर विपरीत परिणाम होतो. यापासून बचाव करणे, अधिकाधिक वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन याला महत्त्व देण्याचा मानस ‘नन्हे हाथ फाऊंडेशन’ या पर्यावरणसंबंधी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेने केला आहे. वर्षभरात एक हजार वृक्ष लागवड करून शहरातील नागरिकांना मोकळा श्‍वास घेण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीचा उद्देश उराशी बाळगला आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी... हे फक्त गुणगुणण्यापुरते नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातही त्याला मोठा वाटा आहे, याची जाणीव कोरोना काळात झाली. प्राणवायूनिर्मिती करण्यात वृक्ष मोलाचे भूमिका बजावतात. त्यामुळे हिरवागार परिसर, पक्ष्यांचा किलबिलाट व प्राणवायू असा त्रिवेणी संगम कायम राहावा, म्हणून ‘नन्हे हाथ फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेने वर्षभरात एक हजार रोपांची लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचा निर्धार केला आहे.

वसई, विरार शहरात मोठ्या प्रमाणात महापालिका व सामाजिक संस्थांनी विविध जातींच्या रोपांची लागवड केली आहे. त्यांची रोज निगा राखण्यासाठी व वाढ होण्यासाठी व्यवस्था असावी, म्हणून पर्यावरणावर काम करणाऱ्या नन्हे हाथ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने वृक्षांना दत्तक घेतले आहे. पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, याकरिता संस्थेचे ३५ हून अधिक सदस्य मेहनत घेत आहेत. पाण्याची नासाडी होण्याचे प्रमाण कमी आहे. पावसाळ्यात वृक्ष लागवड केल्यास त्यांना पुरेसे पाणी मिळून त्यांची वाढ होईल, या हेतूने पर्यावरण दिनापासून एक हजार रोपांची लागवड वसई, विरार, नालासोपारा, मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या परिसरात केली जाणार आहे. त्यानंतर या संस्थेचे सदस्य रोपांना पाणी, खत देत निगा राखणार आहेत. त्यामुळे वृक्षांची वाढ होण्यास मदत होणार आहे.

रोपट्यांची लागवड केल्यावर ते जगवण्यासाठी संस्थेचे सदस्य शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. स्वतःच्या खिशातून पैशांनी विविध जातींची रोपे विकत घेतात आणि मोकळी जागा, वृक्षांना हानी पोहचणार नाही व त्यांना पुरेसे पाणी मिळेल, याची व्यवस्था करत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यंदा पर्यावरण दिनानिमित्त एक हजार वृक्षलागवडीचा श्रीगणेशा केला जाणार आहे.

ठिबक सिंचनाप्रमाणे पाण्याची सोय
टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या जमा करून त्याला कंटेनर बसवण्यात आला व एका छोट्या नळीच्या साह्याने रोपांच्या मुळापर्यंत पाणी जाईल, याची व्यवस्था केली आहे. त्यांचे हे कार्य पाहणारे नागरिकदेखील हा प्रयोग करू लागले आहेत. त्यामुळे झाडांना आवश्‍यक त्या वेळी गरजेपुरते पाणी मिळते. हे काम ठिबक सिंचनाप्रमाणे होत असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते.

प्राणवायूची निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम वृक्ष करतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. प्रदूषणापासून पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी वृक्ष ही काळाची गरज आहे. त्यामुळे पर्यावरण दिनापासून वर्षभर टप्प्याटप्प्याने एक हजार रोपांची लागवड केली जाणार आहे.
- संजय वैष्णव, संस्थापक, नन्हे हाथ फाऊंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT