NAVI MUMBAI metro  SAKAL
मुंबई

Navi Mumbai News: नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत होणार वाढ; प्रवाशांना मिळणार दिलासा

आता मेट्रोमुळे तळोजा आणि खारघर उपनगरातील वाहतुकीची समस्या काही प्रमाणात दूर झाली आहे | The traffic problem in Kharghar suburb has been solved to some extent

CD

Navi Mumbai: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यावर सिडको प्रशासनाचा विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या खारघर, तळोजावासीयांची वाहतूक समस्या दूर होणार आहे.

तळोजा वसाहतीमधील प्रवाशांना एनएमएमटी बस अथवा दुप्पट भाडे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. आता मेट्रोमुळे तळोजा आणि खारघर उपनगरातील वाहतुकीची समस्या काही प्रमाणात दूर झाली आहे.


सध्या मेट्रोची वेळ सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरू आहे. रात्री १०नंतर मेट्रोची सेवा बंद केली जाते. रात्री दहानंतर खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा मार्गावर वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यामुळे सेक्टर ३४, ३५ तसेच तळोजावासीयांना खासगी अथवा रिक्षाने प्रवास करताना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.

त्यामुळे सिडको प्रशासनाने रात्री १२पर्यंत मेट्रोची वेळ वाढवावी, अशी मागणी केली जात होती. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन सिडकोकडून लवकरच मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. सिडकोच्या मेट्रो विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत ‘सकाळ’ला माहिती दिली आहे.

नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ व्हावी, अशी प्रवांशांची मागणी आहे. एप्रिल महिन्यात मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे.


- प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT