कासा, ता. २८ (बातमीदार)ः पावसाळा सुरू झाला असताना पाच महिन्यांपूर्वी आदिवासी विकास महामंडळाला विकलेल्या भाताचे पैसे अजूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. यामुळे खरीप हंगामासाठीची खते, बियाणे आणि मजुरीसाठी पैसे नसल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पालघर जिल्ह्यात भाताची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. जिल्ह्यातील धरमपूर, कासा तसेच इतर भागातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला भात आदिवासी विकास महामंडळाला विक्री केला होता. यंदा भाताला प्रति क्विंटल २,३०० रुपये भाव जाहीर करण्यात आला; मात्र गेल्या पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे बियाणे, खते, मजुरीसाठी पैशांची तातडीने गरज असताना शेतकऱ्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत; पण अधिकारी थातूरमातूर उत्तरे देत दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे चार दिवसांची मुदत देताना महामंडळाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
-------------------------------------
रक्कम लवकरच खात्यात
आदिवासी विकास महामंडळाचे प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांच्याकडे विचारणा केली असता काही शेतकऱ्यांचे पैसे अद्याप बाकी असल्याचे त्यांना सांगितले. तसेच शेतकऱ्यांना जाहीर झालेला बोनसही मंजूर झाला असून येत्या दोन-तीन दिवसांत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती दिली.
----------------------------------------------
जर वेळेवर पैसे मिळत नसतील, तर यापुढे महामंडळाला भात विकणार नाही. तसेच, सरकार आमच्यासाठी बोनस जाहीर करीत आहे; पण आधी मागील पैसे तरी द्या, मग बोनस द्या.
- विष्णू जाधव, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.