मुंबई

हिवताप नियंत्रणासाठी १७३८ जणांची रक्‍त तपासणी

CD

अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून कधी ऊन, कधी पाऊस असे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवतापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हिवताप विभागामार्फत रक्तचाचणी केली जात आहे. जानेवारी ते जूनदरम्‍यान एकूण एक हजार ७३८ जणांच्या रक्‍ताचे नमुने तपासले असून, यात ३९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्‍यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या यंदा घटली आहे.
सहा महिन्यांत पनवेलमधील शहरी भागात एक हजार १५२ जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत, तर उरण येथे ५८ जणांचे नमुने तपासले असता दोघे पॉझिटिव्ह आले.
पनवेल ग्रामीण भागात १२१ जणांचे नमुने तपासले असता एक जण पॉझिटिव्ह आला. खालापूर येथे ४४ जणांपैकी एक पॉझिटिव्ह, सुधागड येथे २६ जणांपैकी एक पॉझिटिव्ह, अलिबाग येथे ६६ जणांपैकी चार पॉझिटिव्ह, मुरूड येथे १४३ जणांचे नमुने तपासले असता दोन जण पॉझिटिव्ह आले. रोहा तालुक्यात २८ जणांचे नमुने तपासले तेथे एक पॉझिटिव्ह आला. माणगाव तालुक्यात १०० जणांचे नमुने तपासले असता दोघे पॉझिटिव्ह आले. उर्वरित कर्जत, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, आणि पोलादपूर येथे सहा महिन्यात एकही डेंगीच्या रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाकडून देण्यात आली.

डॉक्‍टरांचा सल्‍ला घेण्याचे आवाहन
ज्‍या तालुक्यात डेंगीसदृश परिस्थिती निर्माण होते, तेथे आमच्या विभागाचे कर्मचारी जाऊन सर्वेक्षण करतात. डेंगीची अळी नष्ट करण्यासाठी ऑबिट द्रावण मिसळून दिले जाते. पावसाळ्याच्या दिवसांत घराचा परिसर अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यांसारख्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होते, अशी ठिकाणे नष्ट करावीत. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. त्यामुळे डासांचा शिरकाव होणार नाही. आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयीन अधीक्षक सिद्धार्थ चैरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT