मुंबई

धरणीतून उगवले हिरवे सोने

CD

वाणगाव, ता. २९ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यातील भातशेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशातच गतवर्षी निसर्गामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे आर्थिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता, पण यंदा पावसाने लवकर हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचा मुहूर्त लवकर साधल्याने उगवलेल्या भातांच्या रोपांमुळे ‘धरणी मातेच्या पोटातून हिरवे सोने’ उगवल्याचा भास होत आहे.
पारंपरिक भातशेतीला आदिवासी समाजात देव मानतात. त्यामुळे परंपरागत चालत आलेली प्रथा टिकून राहावी, यासाठी जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने भातपेरणी केली जाते. काही भागात पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक पद्धतीने ट्रे रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. यांत्रिकीकरणाने भातशेतीचे क्षेत्र वाढावे, यासाठी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करत आहेत. यंदा वेळेवर पेरणी आणि पावसाचे सातत्य असल्याने भातासाठी अतिशय पोषक वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे.
----------------------------------
उगवण क्षमता चांगली
जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी १६ जूनच्या आसपास पेरणी केली आहे. साधारणतः १५ दिवसांची रोपे झाली आहेत. पुढील १० ते १५ दिवसांत रोपे लागवडीयोग्य होतील. यंदा भात बियाण्यांची उगवण क्षमता चांगली झाली असून, जिल्ह्यातील शेतकरी आंतरमशागतीच्या कामांना लागला आहे.
------------------------------
त्रिसूत्रीचा वापर फायदेशीर
यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केली आहे. पुढील काळात पावसाचे सातत्य राहिल्यास वेळेवर लावणी तसेच परतीच्या पावसाने नुकसान कमी केल्यास वेळेवर कापणी होईल. उत्पादनवाढीसाठी वेळेवर ‘पेरणी, लावणी आणि कापणी’ या त्रिसूत्रीचा वापर केल्यास उत्पादनामध्ये भर पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

'सैराट' साठी तानाजी गळगुंडेला लाख नाही तर काही हजारांमध्ये मिळालेले पैसे; सगळे मित्राच्या हातात ठेवले कारण...

Latest Marathi News Live Updates: अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू, टेम्पो चालक ताब्यात

ED Raid on Congress MLA : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर 'ED'चे छापे; कोट्यवधींचे सोने अन् रोकड जप्त

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

SCROLL FOR NEXT