विरार, ता. २९ (बातमीदार)ः वसई-विरार महापालिका मुख्यालयाशेजारील उभारलेला पुतळा गायब झाल्याने विविध तर्क-वितर्क काढण्यात येत होते. अशातच महापालिकेने शहरातील पुतळे डागडुजीसाठी काढल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे सुशोभीकरणाचे काम वादात सापडण्याची शक्यता आहे.
वसई-विरार शहर पालिकेतर्फे काही महिन्यांपूर्वी पालिका क्षेत्रात सुशोभीकरण करण्यात आले होते. कित्येक ठिकाणी विविध व्यक्ती, पशु-पक्षी यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत; मात्र त्याची देखभाल करण्यात पालिका असमर्थ ठरली आहे. पालिका मुख्य कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेले पुतळे तीन-चार दिवसांपूर्वी गायब झाले आहेत. याबाबत पालिका प्रशासनाशी संपर्क केला असता डागडुजीसाठी पुतळे काढल्याचे सांगण्यात आले; पण दोन वर्षांपूर्वी लावलेले पुतळे खराब झाल्याने यावरून महापालिकेवर टीकेची झोड उठली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.