नवीन पनवेल, ता. १ (बातमीदार) : बंद असलेली फुलांची तीन दुकाने आगीत जळाल्याची घटना पनवेल भाजी मार्केटमध्ये सोमवारी (ता. ३०) रात्री ११च्या सुमारास घडली. अग्निशमन दलाने लागलीच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पनवेल अग्निशमन केंद्राचे अधिकारी हरिदास सूर्यवंशी यांनी दिली. पनवेल शहरातील मुख्य बाजारपेठेत मोतीराम स्नॅक्सजवळ सोमवारी रात्री सलून आणि फुलांच्या दुकानात काहीतरी जळत असल्याचा वास नागरिकांना येऊ लागला. त्या वेळी सोनू राजभर या जागरूक नागरिकाने अग्निशमन दलास याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहनासह तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. फुलांची दुकाने तात्पुरत्या शेडमध्ये सुरू असल्याने आग लागली आणि त्यात लाखोंचे नुकसान झाले. ही दुकाने मातीच्या भिंती किंवा पत्र्याच्या शेडमध्ये असती तर आगीची घटना टाळता येऊ शकली असती किंवा नुकसान कमी झाले असते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.