श्रीवर्धन, ता. १ (वार्ताहर) ः श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यात आला आहे, मात्र उधाणामुळे बंधाऱ्यावरील रॅम्प तसेच पायऱ्या उखडल्या असून, मोठे नुकसान झाले आहे. यामुळे स्थानिक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत असून, नगर परिषदेने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
उधाणाचे पाणी लोकवस्ती अथवा शेती, वाड्यांमध्ये येऊन आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून २००९ मध्ये दांडा विभाग ते महेश्वर पाखाडीदरम्यान दीड किलोमीटर लांबीचा बंधारा श्रीवर्धन नगर परिषदेकडून बांधण्यात आला आहे. तसेच बंधाऱ्यावर सुशोभीकरण करीत अत्याधुनिक दिवे, आसन व्यवस्था, शोभिवंत झाडे तसेच दीड किलोमीटर लांबीच्या अंतरावर लाद्या बसवण्यात आल्या आहेत. केतकी बन, मठाचा गवंड, गणपती विसर्जन घाटरस्ता, शासकीय विश्रामगृह येथून किनाऱ्याकडे जाणारा रस्ता, दांडा मार्गावरपर्यंत बंधाऱ्यावर पायऱ्या व गणपती विसर्जनाकरिता रॅम्प करण्यात आले आहेत, मात्र काही दिवसांपासून उधाण लाटांमुळे बंधाऱ्याचे दगड निखळले आहेत. मठाचा गवंड येथील किनाऱ्याकडे जाणारा रॅम्प व पायरीवरील लाद्या पूर्णपणे उखडल्या आहेत, तर रॅम्पला तडे गेले आहेत. सद्यःस्थितीत स्थानिक व पर्यटकांना या मार्गावरून कसरत करत किनाऱ्यावर जावे लागते.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.