मोरबे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ
७८.३० टक्के धरण भरले
वाशी, ता. २७ (बातमीदार) ः पावसामुळे मोरबे धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरणाची पातळी ही ८३.५४ मीटर झाली असून, ७८.३० टक्के धरण हे भरलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईत १९ मार्च २०२६ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
नवी मुंबईच्या मोरबे धरणात मागील वर्षी पाण्याची पातळी ही २७ जुलै रोजी ८२.९० मीटर होती, तर धरणात ७५.५० टक्के पाणीसाठा शिल्लक होता, पण यंदा मोरबे धरणाची पाणीपातळी ही ८३.५४ मीटर इतकी असून, आता ७८.३० टक्के भरलेले आहे. मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ८८ मीटर इतका पाणीसाठा लागतो. मोरबे धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. १९ मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात शिल्लक आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.