मुंबई

मच्छीमारांच्या मृत्यूला अधिकारी जबाबदार!

CD

विरार, ता. ३१ (बातमीदार) : पावसाळा मासेमारीबंदी असतानाही धोका पत्करून खवळलेल्या समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या मच्छीमारांच्या मृत्यूला मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. याप्रकरणी स्थानिक परवाना अधिकाऱ्यापासून जिल्ह्याचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, आयुक्त कार्यालयातील मत्स्य उपायुक्त तथा मत्स्य आयुक्त यांविरोधात कायदेशीर निर्देशांची अवज्ञा करणे यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे मुख्य समन्वयक मिल्टन सौदिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याचसोबत मासेमारीबंदीचे उल्लंघन करून मासेमारीकरिता जाणाऱ्या बोटी ज्या संस्थेच्या आहेत, त्यांच्यावरही कारवाई करून त्यांना कोणी डिझेल पुरवले, याचाही शोध घेण्याची मागणी केली आहे.

राज्याच्या जलधी क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत अशी ६१ दिवसांची पावसाळी मासेमारीबंदी लागू आहे. २६ जुलै रोजी करंजा बंदरातील ‘तुळजाई’ ही बोट मासेमारीला गेलेली असताना खवळलेल्या समुद्रात जलसमाधी मिळाली. या बोटीतील आठ मच्छीमारांपैकी तीन मच्छीमार बेपत्ता हाेते, त्यांचे मृतदेह सापडले. ज्या मच्छीमारांनी पोहून किनारा गाठला, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर शनिवारी (ता. २६) आणखी एक बोट मासेमारी करून किनाऱ्यावर येताना समुद्रात बुडाली. यातील नऊ खलाशी त्यांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरले. तथापि, एका खलाशाचा अंत झाला. अधिकाऱ्यांमुळे हे चारही मच्छीमार मृत्यूच्या जबड्यात गेले, असा आरोप आता होत आहे.

मत्स्य खात्याचे अधिकारी पावसाळी मासेमारीबंदीच्या अंमलबजावणीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात. एकप्रकारे खवळलेल्या समुद्रात जीव धोक्यात घालण्यासाठी हे अधिकारीच मच्छीमारांना अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देत आहेत. राज्याच्या किनारपट्टीवर पावसाळी मासेमारीबंदी लागू असतानाही दरवर्षी करंजा, रेवस, अलिबाग या ठिकाणचे मच्छीमार बेकायदा मासेमारी करतात. ही बाब वेळोवेळी मत्स्य खात्याच्या निदर्शनास आणूनही अधिकारी दुर्लक्ष करतात. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे करंजातील चार मच्छीमारांना हकनाक प्राणास मुकावे लागले आहे, असा संताप सौदिया यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: अभिषेक शर्मा - शुभमन गिलच्या वादळाने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; भारताचा सुपर फोरमध्ये पहिला विजय

IND vs PAK, Video: सुर्यकुमार यादवचा जुगाड! 'गार्डन'मध्ये फिरणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाला चतुराईने केले बाद

IND vs PAK Video: दोनदा चूक झाली, पण तिसऱ्यांदा अफलातून कॅच घेत अभिषेक शर्माची गर्जना; आक्रमक खेळणारा सैम आयुब कसा झाला आऊट?

Pune: गोधड्या धुण्यासाठी गेले, पाण्यात अनेकजण अडकले, तरुणांनी धाडस दाखवलं अन्...; खडकवासलातील थरारक प्रसंग

IIM Centre: 'आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात';राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला मंजुरी; २०२६ पासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार

SCROLL FOR NEXT