मुंबई

फळबाजार दुर्गंधीसह अस्वच्छतेच्या विळख्यात

CD

फळबाजार दुर्गंधीसह अस्वच्छतेच्या विळख्यात
व्यापाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम; प्रशासनाचे दुर्लक्ष
तुर्भे, ता. २ (बातमीदार) ः वाशीतील घाऊक फळबाजार सध्या कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी यामुळे बिकट अवस्थेत आहे. बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे येथे स्वच्छतेचा गंभीर अभाव दिसून येत असून, या परिस्थितीमुळे व्यापारी, कामगार तसेच ग्राहक हैराण झाले आहेत. नवी मुंबई महापालिकेला स्वच्छतेबाबत देशात गौरव मिळत असताना, फळबाजार मात्र त्याच्या विरोधात अत्यंत बकाल आणि अस्वच्छतेत अव्वल असल्याचे दिसून येत आहे.
१९९०च्या सुमारास उभारण्यात आलेल्या या फळबाजारात आजही कचऱ्याचे व्यवस्थापन मुळातच अस्तित्वात नाही. व्यापारी गाळ्यांतून निघणारा कचरा थेट दुकानासमोर टाकतात. पावसाळ्यात या कचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढते. रोजच्या रोज सुमारे २० टन कचरा येथे तयार होतो. यात सडलेली फळे, पेंढा, कागद असा सडणारा कचरा असतो. पावसाचे पाणी आणि सडलेला कचरा यामुळे संपूर्ण बाजार परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे बाजारात फिरणे म्हणजे नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
कचरा उचलण्याची प्रक्रिया संध्याकाळी बाजार बंद झाल्यावर केली जाते. त्यामुळे दिवसभर बाजारात घाण, चिखल, पाणी साचलेले असते. यामुळे डास, माश्‍या यांचा त्रास होतो. याचा थेट परिणाम व्यापारी आणि मजुरांच्या आरोग्यावर होत आहे. बाजार परिसरात चालणेही कठीण झाले आहे. व्यापाऱ्यांकडे कचराकुंड्यांची व्यवस्था नाही आणि बाजार समितीकडूनही कचरा टाकण्यासाठी कुठलीही जागा निश्चित केलेली नाही. परिणामी, प्रत्येक गाळा बाहेरच आपला कचरा टाकतो. कधी कधी संपूर्ण फळांची गाडी खराब झाल्यास तीदेखील बाजारातच रिकामी केली जाते. या संपूर्ण व्यवस्थेचा अभाव, नियोजनाचा अभाव आणि बाजार समितीचा हलगर्जीपणा यामुळे फळबाजार दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छतेचे केंद्र बनत चालले आहे.
..............
बाजार घटकांची मागणी
व्यापाऱ्यांनी बाजार समितीला विनंती केली आहे, की प्रत्येक गाळ्यासाठी स्वतंत्र कचराकुंडी, कचरा संकलनासाठी निश्चित जागा आणि दररोज सकाळ-संध्याकाळ साफसफाई अशी ठोस उपाययोजना त्वरित राबवण्यात यावी. बाजार संचालक, सचिव, प्रशासन यांनी मिळून यावर तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
...............
फळबाजारातील कचरा बाजार संपल्यानंतर मशीन आणि कामगारांच्या सहाय्याने उचलला जातो. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर निघणाऱ्या कचऱ्यासाठी एकाच ठिकाणी कचराकुंडी उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे ती व्यवस्था सध्या नाही.
-किरण घोलप, स्वच्छता अधिकारी, एपीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

MLA Rohit Pawar : औद्योगिक कंपन्यांच्या क्षेत्रात दादागिरी नेमकी कोणाची?

IND vs ENG 5th Test: भारताने रचला विजयाचा पाया; यशस्वी जैस्वालच्या शतकाने इंग्लंडची भंबेरी, उभं केलं गाठता न येणारं लक्ष्य

Local Viral Video: लोकल तिकीट तपासणी मोहिमेला हिंसक वळण; प्रवाशाचा रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला; व्हिडीओ व्हायरल

Uddhav Thackeray : निष्ठावान विकले जाऊ शकत नाहीत; उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले लक्ष्य

SCROLL FOR NEXT