मुंबई

उलवेतील नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त

CD

उलवेतील नागरिक नागरी समस्यांनी त्रस्त

नेरूळ, ता. २ (बातमीदार) ः नवी मुंबईतील झपाट्याने विकसित होणाऱ्या उलवे विभागाला नागरी समस्यांनी वेढले आहे. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
उलवेतील अनेक सेक्टरमध्ये अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाहतुकीचा गोंधळ, खड्डेमय रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, अपुरी पार्किंग व्यवस्था, रिक्षाचालकांची मुजोरी, अनधिकृत फेरीवाले, बस थांबे, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, कचऱ्याची विल्हेवाट अशा अनेक अडचणींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

रिक्षाचालकांची मुजोरी
रिक्षाचालकांकडून अधिकृत मीटरऐवजी तोंडी भाडे आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे. रिक्षात बसण्याआधीच चालक प्रवाशांकडून भाडे ठरवतात. थोड्या अंतरासाठीही ५० ते १०० रुपयांपर्यंत भाडे मागितले जाते. महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होतो.

गटारांच्या झाकणांची दुरवस्था
रस्त्यांवर अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटलेली, उघडी किंवा सरकलेली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात ही गटारे पाण्यात लपतात व अपघातांना निमंत्रण मिळते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बस थांबे अपुरे व दुर्लक्षित
लोकसंख्येनुसार सार्वजनिक वाहतुकीची गरज वाढली असतानाही बसथांब्यांची संख्या अपुरी असून, असलेले बस थांबेही गैरसोयीचे ठरत आहेत. बस थांब्यांवर छप्पर किंवा बसण्यासाठी आसरा नसल्यामुळे प्रवाशांना पावसात भिजत वाट बघावी लागत आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट
प्रमुख रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. पालिकेचे दुर्लक्ष व कारवाईचा अभाव यामुळे फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

स्थानिक प्रशासन वेळोवेळी कारवाई करते, असा दावा केला जात असला तरी वास्तवात फेरीवाल्यांचे अतिक्रमण पुन्हा पुन्हा सुरू आहे. शाळकरी मुलं, वृद्ध नागरिक व महिलांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागतो.
- जयेश होवाल

पार्किंगची समस्या गंभीर
वाढत्या लोकसंख्येनुसार पार्किंगची सोय अपुरी पडत असून, वाहनधारकांपुढे दररोज जागेचा संघर्ष निर्माण झाला आहे. रस्त्यांवर आणि सोसायट्यांबाहेर वाहनांची अतिक्रमणासारखी स्थिती दिसून येत असून, अपघात व वादाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अग्निशमन, रुग्णवाहिका यांसारख्या आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होतो.

संध्याकाळी घरी आलो की गाडी पार्क करायला जागा मिळत नाही. कधी कधी दुसऱ्याच्या समोर गाडी लावावी लागते आणि मग वाद होतो. यामुळे अधिकृत पार्किंग झोन तयार करावे. पार्किंगसाठी नियमावली लागू करावी.
- तुषार कराडे, स्थानिक नागरिक

अपुरा पाणीपुरवठा
काही महिन्यांपासून अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा ही गंभीर समस्या बनली आहे. काही भागांत तर दिवसाआडच पाणी येत असून, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी नागरिकांना सकाळीच पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

उघडी विद्युत डीपी
विद्युत वितरण पेटी (डीपी) उघड्या अवस्थेत दिसून येत आहे. विद्युत पेटीला दरवाजा असला तरी तो पूर्णतः उघडा असून, आतील वायरिंग बाहेरून स्पष्टपणे दिसते. पावसाळ्यात ही स्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते. डीपीजवळ कचऱ्याचा ढीगदेखील जमा झाला असून, त्यामुळे विजेचा धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन चिघळलं

SCROLL FOR NEXT