मुंबई

मुंबई कोस्टल रोडचे काम पूर्ण

CD

मुंबई कोस्टल रोडचे काम पूर्ण
अभियंता व कर्मचाऱ्यांची वर्सोवा-भाईंदर प्रकल्पात रवानगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. १०.५ किमी लांब असलेल्या आकर्षक विहाराचे कामदेखील पूर्ण झाले असून, येत्या १५ ऑगस्ट रोजी त्याचे उद्‌घाटन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पात गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेले ११ अभियंते आणि आठ कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे आता विशेष काम उरलेले नाही. त्यामुळे त्यांना महापालिकेने वर्सोवा ते मिरा-भाईंदरदरम्यान नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पात बदली करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्याने येथील अभियंता, कर्मचाऱ्यांना सध्या काम उरलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पात अनुभवी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात नेमणूक न करता त्याच प्रकारच्या नवीन प्रकल्पात त्यांचा अनुभव वापरण्यात येणार आहे. सध्याच्या कोस्टल रोडच्या देखभालीसाठी केवळ एक-दोन अभियंते आणि काही कर्मचारी पुरेसे ठरणार आहेत, बाकीच्या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही काम नसल्याने त्यांना नवीन प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार आहे. महापालिकेने या कर्मचाऱ्यांची वर्सोवा ते मिरा-भाईंदरदरम्यान नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पात बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Fare Hike : एसटीच्या तिकिट दरात वाढ, ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांच्या खिशाला कात्री

Dmart Offers : डीमार्ट तुम्हाला देणार कर्ज? व्याजदरही कमी; नेमका विषय काय, बघा एका क्लिकवर

Prada Tote Bag Indian Railway: काय काय चोरणार! कोल्हापुरी चपलेनंतर लालपरीची फ्लोअर डिझाईन चोरली; 'प्राडा' विकतंय पावणेतीन लाखांना बॅग

Satana News : 'ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे!' बागलाण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा तहसीलदारांना घेराव

World Cup 2025: पहिल्या सामन्यात भारताला सुरुवातीलाच मोठा धक्का, त्यात पावसाचा अडथळा! कशी गेली स्मृती मानधनाची विकेट? VIDEO

SCROLL FOR NEXT