मुंबई

आता लग्नात फक्त संस्कार, अनिष्ट प्रथांना रामराम!

CD

वाडा, ता. ११ (बातमीदार) : आजच्या घडीला किती आलिशान लग्न केले, याचे प्रदर्शन करण्याची चढाओढ समाजात लागलेली दिसत आहे. परिणामी अगदी देशाबाहेर जाऊन खर्चिक लग्नसोहळे करण्याचीच प्रथा सुरू झालेली आहे. त्यामुळे अगदी सर्वसामान्य लोकही कर्ज काढून लग्न करण्याची स्पर्धा करतात. कुणबी समाजातील लग्न सोहळ्यात काही अनिष्ट प्रथा वाढू लागल्याने जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत या प्रथा बंद करत दिखावा संपवण्यासाठी एकमत झाले. वाडा तालुक्यातील अनेक तरुणांनी सहमती नाेंदवत एकदिवसीय लग्न सोहळे करणार असल्याची शपथ घेतली. त्यामुळे भविष्यामध्ये समाजात क्रांतिकारी बदल हाेण्यासाठी मदत हाेईल, अशी ज्येष्ठ नागरिकांकडून अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

आजकाल लग्न समारंभावर भरपूर खर्च केला जातो. अनेकजण आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात मग्न असतो. अनेक प्रसंगी मुक्त हस्ते खर्च केला जातो. लग्न जमेल तितके आलिशान करण्याचा प्रयत्न चालू असतो. यातून सामान्य माणूस निरर्थक पैसा गमवतो. या समस्येवर उपाय काढण्यासाठी वाडा येथे कुणबी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांची रविवारी (ता. १०) सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला समाजातील पाचशेहून अधिक समाजबांधव उपस्थित होते.

हजारो लोकांच्या उपस्थितीत होणारे कुणबी समाजातील लग्न सोहळे व या सोहळ्यात काही सुरू झालेल्या अनिष्ट प्रथा यावर विचारमंथन व्हावे, यासाठी वाडा, विक्रमगड तालुक्यांतील कुणबी बांधवांची ब्लाॅसम रिसार्ट येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. अरुण सावंत, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील, विलास आकरे आदी मान्यवरांसह कुणबी बांधव उपस्थित होते.

डॉ. अरुण सावंत, विश्वनाथ पाटील, प्रवीण पाटील, मोहन पाटील, सुभाष पाटील, विलास आकरे अशा मान्यवरांनी या अनिष्ट प्रथा बंद झाल्याच पाहिजेत, असे मत व्यक्त केले. कुणबी समाजात एखादी दु:खद घटना घडल्यास मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे केले जाणारे विधी किती दिवसांपर्यंत असावेत, या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

मूळ परंपरा नामशेष हाेण्याच्या मार्गावर
कुणबी समाजातील लग्न सोहळ्यात टिळा लावणे, प्री-वेडींग, मेहंदी कार्यक्रम, मांसाहारी भोजन, दारूचे वाटप, लहानग्यांच्या मुखातून वदवून घेतली जाणारी व कुठलाच भावार्थ नसलेली मंगळाष्टके, ठरावीकच मान्यवरांना फेटे बांधणे, असे अनेक नवीन प्रकार या लग्न सोहळ्यात सुरू झाले आहेत. या प्रकारांमुळे लग्न सोहळ्याचा मूळ हेतू, परंपरा नामशेष होत आहेत. यावर विचारविनिमय होणे गरजेचे असल्याने व नव्याने काही सुरू झालेल्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नरेश आकरे यांनी सांगितले.

गावपातळीवर समित्या स्थापन करणार!
अनेकांनी यापुढे एकदिवसीय लग्न सोहळे आयोजित करण्याचे आवाहन केले, तर काही अविवाहित तरुणांनी एकदिवसीय लग्न सोहळ्याला समर्थन देत लग्न करणार असल्याची शपथ घेतली. कुणबी समाजातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासंदर्भात तालुका, विभाग, गावपातळीवर लवकरच समित्या स्थापन केल्या जातील, अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT