मुंबई

रिमझिम पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

CD

कासा, ता. १६ (बातमीदार) : हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. डहाणू तालुक्यात शुक्रवारी (ता. १५) काही भागांत हलक्याफुलक्या सरी कोसळल्या; मात्र अपेक्षेप्रमाणे मुसळधार पाऊस न पडता सततचे ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाची रिपरिप आज शनिवारीही (ता. १६) सुरू आहे. डहाणू समुद्रकिनाऱ्यावर, तसेच जंगलवजा भागांत तुरळक ठिकाणी पावसाचे थेंब पडताना दिसून येत आहेत.

रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गावाकडील शेतकरी मात्र खूश झाल्याचे दिसत आहे. सध्याच्या पेरणीच्या स्थितीसाठी अशाच प्रकारचा संततधार आणि मध्यम स्वरूपातील पाऊस आवश्यक असल्याचे शेतकरीवर्गाने सांगितले. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांना आधार मिळत असून, येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडल्यास खरीप हंगामाला चांगली चालना मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकरांनी ड्रग्सचं सेवन केलं नव्हतं; 'फॉरेन्सिक'चा अहवाल आला, जामीन मंजूर

Crops MSP: 'या' पिकांवरील एमएसपी वाढला, डाळींसाठी नवीन धोरण जाहीर... शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द

Nashik News : रावण दहन सोहळा व रामलीला; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी जारी केली अधिसूचना

Pali News : पाली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) सुलतान बेनसेकर यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT