मुंबई

आधुनिक शेती योजना सुरू

CD

वज्रेश्वरी, ता. १८ (बातमीदार) : ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत भिवंडी पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत पात्र शेतकऱ्यांसाठी चार महत्त्वांच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये सुधारित कृषी अवजारे, विविध सिंचन साहित्य, प्लॅस्टिक तंत्रज्ञानाचा वापर (ताडपत्री व मल्चिंग पेपर); तसेच पिक संरक्षणासाठी काटेरी तार कुंपणासाठी अनुदान यांचा समावेश आहे.
भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकरी व ग्रामीण नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी गोविंद खामकर, कृषी विस्तार अधिकारी निता गवळी व मेघा सख्ये यांनी केले. सरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक साह्याचा उपयोग करून शाश्वत शेती व उपजीविकेकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया २४ जुलैपासून सुरू झाली असून २० ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जाची तालुका स्तर पडताळणी २१ ते २५ ऑगस्टदरम्यान, तर जिल्हा स्तर पडताळणी २५ ते ३१ ऑगस्टदरम्यान केली जाणार आहे.

२० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करा
इच्छुक लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpthaneschemes.com या लिंकवर जाऊन २० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी बाचोटीकर यांनी केले आहे. अर्ज प्रक्रिया पारदर्शक व सुलभ असून पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रांची यादी व इतर सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, उत्पादन खर्च कमी करावा आणि शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करावा, असे आवाहन भिवंडी पंचायत समितीमार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT