मुंबई

तीन माजी नगरसेविकांचा शिंदे गटात प्रवेश

CD

ब्रॅंडचा बँड वाजवण्याचे काम जनता करते : एकनाथ शिंदे
माजी नगरसेविकांचा ठाण्यात पक्षप्रवेश सोहळा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला पाठिंबा दिला. त्यामुळे ८० जागा लढवून ६० जागा आम्ही जिंकलो. काही जण म्हणत होते एकही जागा निवडून येणार नाही; मात्र आमचे ६० आमदार निवडून आले. ब्रॅंडचा बँड वाजवण्याचे काम जनता करीत असते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर केली. ते जेव्हा निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले असते; मात्र जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब होते. मात्र बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली होती, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत बुधवारी (ता. २०) कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेविकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे, प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या माजी नगरसेविका शैलजा भोईर, कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धनुष्य हाती घेतले.

ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी कौटुंबिक नाते प्रत्येक जण जपत होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हे पदाधिकारी काम करतात. आज वारकरी संप्रदायाचेदेखील लोक शिवसेनेत सहभागी झाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सखाराम पाटील, गजानन मांगरूळकर, संजय गायकर, धारीवलीचे उपसरपंच रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील, गौरव ठाकूर, छाया काळे, वारकरी संप्रदाय अध्यक्ष सुरेश ठाकरे, उपसरपंच चंद्रकांत ठाकूर, विश्वनाथ रसाळ, हेदुटणेचे सरपंच रामदास काळण, हरिश्चंद्र मांगरूळकर यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.

अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे
मागील अडीच वर्षांत सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महायुतीच्या काळात स्थगिती सरकारचे सगळे स्पीडब्रेकर काढून टाकले. त्यामुळे जनतेने महायुतीच्या पारड्यात २३२ जागांचे ऐतिहासिक बहुमत दिले, असे ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मागील अडीच वर्षांत शेतकऱ्यांना महायुती सरकारने ४५ हजार कोटींची मदत केली होती. आताही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT