६१२ कंत्राटी कर्मचारी संपावर
शासनात समायोजन करण्याची मागणी
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर)ः रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ६१२ कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांचे समायोजन होत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरू असल्याचा पवित्रा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सामान्य रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेत डॉक्टर, फार्मसी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, समुपदेशक, टेक्निशियन, क्लार्क असे एकूण ६१२ कंत्राटी कर्मचारी आरोग्यसेवा देतात. गेली अनेक वर्षे कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत घेण्याबाबत आंदोलन, मोर्चा, निवेदन शासनाकडे देत आहेत. याबाबत दीड वर्षापूर्वी निर्णय झाला असतानाही शासन कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करीत आहे, असा आरोप राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समितीने केला आहे. या आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळित होऊ नये यादृष्टीने नियोजन केले आहे. त्यामुळे फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक निशिकांत पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.