मुंबई

भेसळ करणाऱ्यांनो खबरदार

CD

भेसळ करणाऱ्यांनो खबरदार
अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम
खारघर, ता. २६ (बातमीदार) : गणेशोत्सवापाठोपाठ येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीत अन्न पदार्थांविषयी अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. याच अनुषंगाने रायगड अन्न, औषध प्रशासन विभागाने गेल्या चार महिन्यांत सहा ठिकाणी धाड मारून चार लाख ७४ हजारांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त केले आहेत. त्यामुळे भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
रायगड जिल्ह्यात घरोघरी बाप्पा विराजमान होत असतात. गणेशोत्सव कालावधीत मोदक, फराळ, प्रसाद खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. या कालावधीत मिठाई, खवा, मावा, रवा, मैदा, खाद्यतेल मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. मागणी वाढल्याने या काळात भेसळीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अन्नातून विषबाधेचा प्रकार घडू नये, यासाठी अन्न व औषध विभाग सज्ज झाला आहे. तसेत अन्नपदार्थांच्या दर्जाविषयी कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------------
दोन पथके तैनात
रायगड जिल्ह्यात बाराशेहून अधिक मिठाईची दुकाने आहेत. त्यात पनवेल महापालिका हद्दीत जवळपास अडीचशे मिठाईची दुकाने आहेत. उत्सव काळात मिठाई, फराळ तसेच इतर पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात भेसळयुक्त अन्न तयार व विक्री होण्याचा धोका असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने दोन पथके तयार करण्यात आली आहेत.
---------------------------------------
दुकानदारांसाठीचे निर्देश
- मिठाई उत्पादक, विक्रेत्यांनी आस्थापनेचा परिसर स्वच्छ ठेवावा.
- कच्चे अन्नपदार्थ नोंदणीधारक व्यवसायाकडून खरेदी करावेत.
- आजारी व्यक्तीने अन्नपदार्थ हाताळू नये.
- मिठाई बनविताना टोपी, मास्क, हातमोजे वापरावे.
-------------------------------------------
सहा ठिकाणी धाडी
रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, श्रीवर्धन, रोहा, माणगाव अशा विविध ठिकाणी १५६ ठिकाणी तपासणी करून ९३ ठिकाणी नमुने तपासणी करण्यात आले आहेत. तसेच सहा ठिकाणी धाड मारून चार लाख ७४ हजारांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
ृ-------------------------------------------
रायगड अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून मिठाई, खाद्यपदार्थ विकेत्यांना बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच पथकांमार्फत अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.
- नितीन मोहिते, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Selfie death: सेल्फीमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल; २७१ बळी, इतर देशांमध्ये काय परिस्थिती?

World Cup 2011 Final मध्ये युवराजच्या आधी धोनीने फलंदाजीला येण्याचं खरं कारण काय? सचिन तेंडुलकरनेच सांगितलं सत्य

Pig: जगभरात सर्वाधिक वराह कोणत्या देशात आहेत? भारतातले कोणते राज्य आहे आघाडीवर?

Umarga Crime : महाराष्ट्र ग्रामीण बँकेची तिजोरी फोडली; नाईचाकूर शाखेतून चोरट्यांनी केले १९ लाख लंपास

Latest Maharashtra News Updates: पुलांवरून गणेश मिरवणूक नेताना काळजी घ्या, महापालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT