मुंबई

गणेश विसर्जन घाटांवर नावापुरती मलमपट्टीचे

CD

गणेश विसर्जन घाटांवर नावापुरती मलमपट्टी
स्वच्छतेअभावी भक्तांमध्ये नाराजी; ठेकेदारांकडून दर्शनी भागातच स्वच्छता
खारघर, ता. २६ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन घाट स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे गरजेचे असताना, खारघर परिसरातील स्थिती पाहता, या कामात गंभीर त्रुटी समोर येत आहेत. पालिकेने ठेकेदारांची नियुक्ती करून स्वच्छतेसाठी सूचना दिल्या असतानाही प्रत्यक्षात फक्त दर्शनी मलमपट्टीचे काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
खारघर परिसरातील घरकुल, बेलपाडा, मुर्बी, कुटुक बांधण, पेठ, फरशीपाडा या गावांच्या लगत नैसर्गिक जलस्रोतांवर गणेश विसर्जनासाठी घाट उभारले जातात. प्रत्येक वर्षी येथे मोठ्या संख्येने विसर्जनाची व्यवस्था केली जाते, मात्र यावर्षी तलावात पसरलेल्या पानवेली, प्लॅस्टिक पिशव्या आणि वाढलेले गवत काढण्यात आलेले नाही. तसेच तलावातील दगड आणि साचलेली माती दूर करण्याचे कामही करण्यात आले नाही. उलट ठेकेदारांकडून केवळ वरवरची स्वच्छता करून मलमपट्टी केली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थांनी पालिका आयुक्तांनी स्वतः पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. गणेश विसर्जनासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या वेळी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अयोग्य आहे. तलावातील प्रदूषणामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगण्यात आले. या विषयी पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, गणेशोत्सव काळात सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जाईल आणि तलाव परिसराची योग्य प्रकारे स्वच्छता केली जाईल, असे सांगितले.
.................
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
गणेशोत्सव काळात रस्त्यांची स्थितीही चिंताजनक आहे. गेल्या १५ ते २० दिवसांत विविध राजकीय पक्षांनी पालिका प्रशासनाला निवेदने देऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली होती, मात्र पालिकेकडून केवळ २३ ऑगस्टपासून दुरुस्तीचे काम हाती घेतले गेले. त्यातही पावसाळ्यामुळे काम ठप्प झाले आहे. परिणामी गणेशभक्तांना विसर्जन घाटाकडे जाण्यासाठी खड्ड्यांनी व्यापलेल्या रस्त्यांचा सामना करावा लागणार आहे.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

Latest Maharashtra News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

World Cup 2011 Final मध्ये युवराजच्या आधी धोनीने फलंदाजीला येण्याचं खरं कारण काय? सचिन तेंडुलकरनेच सांगितलं सत्य

Selfie death: सेल्फीमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल; २७१ बळी, इतर देशांमध्ये काय परिस्थिती?

Pig: जगभरात सर्वाधिक वराह कोणत्या देशात आहेत? भारतातले कोणते राज्य आहे आघाडीवर?

SCROLL FOR NEXT