मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये डेंगीमुळे दहा जणांचा मृत्यू?

CD

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात सध्या डेंगीची लागण झाल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. गेल्या काही दिवसांत सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुसळधार पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार वाढत असून, त्यातून डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे. त्यातच डेंगीला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची संख्यादेखील वाढत असल्याचा संशय आहे.

मिरा-भाईंदर शहरात सध्या मोठ्या प्रमाणात ताप, सर्दीचे रुग्ण आढळून येत असून, खासगी दवाखाने रुग्णांनी भरलेले दिसून येत आहेत. या रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. भाईंदर पश्चिम भागात राम मंदिर परिसरात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा, तसेच पेणकर पाडा भागात एका १३ वर्षीय मुलाचा नुकताच मृत्यू झाला आहे, तर उत्तन व चौक परिसरात गेल्या काही दिवसांत किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी डॉक्टरांनी हे मृत्यू डेंगीमुळे झाल्याचे सांगितले आहे, मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागात अद्याप तशी अधिकृत नोंद नाही. असे असले तरी शहरात डेंगीची लागण झालेले रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने उत्तन भागातील गल्ली-बोळात पाणी साचले आहे. त्यामुळे डेंगीची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. खासगी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तन भागात डेंगीची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात असून, उत्तन व चौक भागात किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती खासगी डॉक्टरांनी दिल्याचे मच्छीमारांचे नेते बर्नड डिमेलो यांनी दिली. महापालिकेने विशेष डॉक्टरांचे एक पथक पाठवून उत्तन परिसराची तत्काळ पहाणी करावी, तसेच या भागात धूर फवारणी व साफसफाईची मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी डिमेलो यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

कोणती काळजी घ्यावी?
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाणही वाढले आहे. डेंगीची लागण एडीस इजीप्ती या जातीच्या मादी डासामुळे होते. हे डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतात. त्यामुळे पावसाने साचलेल्या पाण्यात या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. झाडांना घातलेले पाणी, वातानुकूलित यंत्रातून बाहेर पडून जमा झालेले पाणी, इमारतीच्या आसपास नारळाच्या करवंट्या, टायर तसेच भंगार सामानात जमलेले पावसाचे पाणी यात डेंगीचे डास वाढतात. त्यामुळे परिसराची स्वच्छता ठेवा व पाणी साचून देऊ नका, भंगार सामानाची वेळोवेळी विल्हेवाट लावा, तापाची लक्षणे दिसू लागताच त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

डेंगीची लक्षणे
- सौम्य ते गंभीर स्वरूपाचे आजारपण येते.
- ही लक्षणे सहसा संसर्गानंतर चार ते १० दिवसांनी दिसतात व २ ते ७ दिवस टिकतात.
- तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागील भागात वेदना, स्नायूदुखी, त्वचेवर पुरळ आदी लक्षणे आहेत.

डेंगीची लागण होत असल्याची माहिती मिळताच गेल्या एक महिन्यापासून विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल, तसेच रुग्ण आढळत असलेल्या परिसरात रहिवाशांच्या रक्ताचे नमुने गोळा करून त्याची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या जातील.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis on cabinet subcommittee : मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा! मंत्रिमंडळ उपसमितीचं फडणवीसांकडून विशेष कौतुक, म्हणाले...

KCR News : केसीआर यांनी स्वत:च्या मुलीची पक्षातून केली हाकालपट्टी; BRS मधील अंतर्गत वादाला नवे वळण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या यशस्वी आंदोलनानंतर शिरूरमध्ये जल्लोष, गुलाल उधळून साजरा

Ajit Pawar : करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखलंच नाही; दादांचा संताप, VIDEO VIRAL

Pune News : पुण्यात पुराचा धोका वाढला; नदीची वहन क्षमता घटल्याने ४०% वाढ

SCROLL FOR NEXT