अंबरनाथ (वार्ताहर) : जलवाहिनीच्या व्हॉल्व्हवर संरक्षक जाळी व कठडा नसल्यामुळे अंबरनाथमधील जावसई गावात एका गाईचा रविवारी रात्री मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या निष्काळजी कारभारावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अंबरनाथ पश्चिम येथील जावसई परिसरातील महेंद्रनगर येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या व्हॉल्व्हभोवती तीन ते चार फूट खोल खड्डा आहे. रात्रीच्या वेळी गुरांचा कळप या रस्त्यावरून जात असताना, एका गाईचा तोल गेला आणि ती थेट व्हॉल्व्हच्या खड्ड्यात पडली. व्हॉल्व्ह तिच्या पोटात घुसल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत मजीप्राचे अधिकारी एम. चांदेकर यांना विचारले असता, त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.