अस्तित्वाच्या धोक्यामुळे ठाकरे बंधू एकत्र
अमित साटम यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः महायुतीच्या सरकारने मुंबईच्या विकासाचा धडाका लावला आहे. मराठी माणूस मुंबईबाहेर जाऊ नये यासाठी विविध योजना हे सरकार राबवत आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंना त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याची भावना आहे. त्यामुळेच दोघे भाऊ एकत्र येत आहेत, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे.
कोस्टल रोड, अटल सेतू, मुंबई मेट्रोचे जाळे तसेच वरळी-शिवडी लिंक रोड, हे मुंबईच्या विकासाचे आणि दळणवळणाच्या सेवासुविधांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर काही प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. बीडीडी चाळी, अभ्युदयनगर आदी वसाहतींचा पुनर्विकास, मुंबईतील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास या माध्यमातून मराठी माणूस मुंबईत टिकून राहावा यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू असून, हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे ते एकत्र येत आहेत, अशी टीका साटम यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि ठाकरे यांनी सपाटून मार खाल्ला आहे. गेली २० वर्षे ठाकरे बंधूंमध्ये दुरावा होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. राजकीय अस्तित्वाची टिकून राहावे यासाठी त्यांची ही लढाई आहे, असेही साटम म्हणाले.
...
मुंबईचे मुंबईपण टिकविणार
भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिले जाईल, विकासाला गती दिली जाईल. पश्चिमी राष्ट्रातील शहरांमध्ये घुसखोरांमुळे त्या शहरांची दशा झाली. मुंबईचे अस्तित्व टिकून राहावे, मुंबईचा चेहरा टिकून राहावा यासाठी प्रयत्न केला जाईल. आम्ही मुंबईच्या अस्तित्वाला प्राधान्य देणार आहोत, असेही अमित साटम म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.