ए विभागातील पाणीपुरवठा २४ तास राहणार बंद
मंत्रालयासमोरील जलवाहिनी फुटली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः मंत्रालयासमोरील ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला आज दुपारी अचानक गळती लागल्याने दक्षिण मुंबईतील अनेक भागांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसेच येथील एका बाजूची वाहतूक संथ गतीने, तर उपनगरांकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून या गळतीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, ए विभागातील २४ तास पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मंत्रालय परिसरात पाणीच पाणी साचल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाला समजताच तत्काळ घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत परिसरातील पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार असल्याने रहिवाशांची गैरसोय झाली आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे मंत्रालय परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दक्षिणेकडील वाहतूक संथ गतीने सुरू असून, उत्तरवाहिनीवरील वाहतूक वाल्मीकी चौक, जमनालाल बजाज मार्ग आणि विनय के. शहा मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
...
या भागांचा पाणीपुरवठा २४ तास बंद
कफ परेड, जी. डी. सोमाणी मार्ग, कुलाबा कोळीवाडा, गीतानगर या भागांतील पाणीपुरवठा २४ तासासाठी बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार असून, नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.