खराब कृषी मालाची बेकायदा विक्री
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) ः कांदा-बटाटा बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात सडका माल बाजार आवारात उघड्यावर टाकला जात आहे. पडणाऱ्या पावसात हा माल अधिकच खराब होत आहे. मात्र कचऱ्यात फेकलेला हा माल विक्रीसाठी वापरला जात आहे. रस्त्यावर टाकून देण्यात आलेला हा माल विकणाऱ्या फेरीवाल्यांची बाजार आवारात वर्दळ दिसून येत आहे. कचऱ्यात फेकलेला हा माल रिक्षातून नेऊन बाहेर कमी दरात विकला जात आहे. त्यामुळे एक प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार सुरू आहे. त्यामुळे बाजार समितीने वेळेत या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी बाजार घटक करत आहेत.
पावसाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात माल कुजण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कृषी माल कचऱ्यात फेकून द्यावा लागतो. मात्र कचऱ्यात फेकलेला हा माल वेळेवर उचलावाही लागतो. वेळेवर हा कृषी माल उचलला गेला नाही तर पावसात भिजून तो कुजून त्यातून दुर्गंधी यायला सुरुवात होते. कांदा-बटाटा बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर असा कचरा निघत आहे. शौचालयाला लागून असलेल्या जागेवर हा कचरा फेकला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याच्या मालाच्या गोणीच्या गोणी पडलेल्या दिसून येतात. हा माल खराब होऊन त्यातून दुर्गंधी ही येत आहे. मात्र कचऱ्यात फेकलेला हा कांदा-बटाटा रस्त्यावर कमी दराने विक्री करणारे काही घटक तो बेकायदा उचलून घेऊन जात आहेत. अशा प्रकार या खराब कृषी मालाची बिनदिक्कत विक्री सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी हा खेळ सुरू असून यावर बाजार समितीने वेसन घातली पाहिले, असे बोलले जात आहे. मुळातच या खराब झालेल्या कृषी मालाची तत्काळ विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.