एमआयडीसी पाणीपुरवठा बंद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ ः महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहिनीचे उन्नतीकरण व तातडीची देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ या वेळेत पाणी पुरवठा बंद ठेवणार आहे. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर पालिका, अंबरनाथ नगरपरिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायती व इतर नागरी वस्त्यांना एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक एक, दोन आणि तीनवर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम २२ ऑगस्ट रोजी करण्यात येणार होते. मात्र, अतिवृष्टीमुळे हे काम पुढे ढकलण्यात आले होते. हे काम आता १८ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते शुक्रवार १९ सप्टेंबर रात्री १२ असा एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काम पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत सुरु करण्यात येईल. मात्र, पुढील काही तासांसाठी कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु राहील याची नोंद नागरिकांनी घ्यावी. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, नगरपरिषद, नागरी वस्त्या, उद्योजक यांनी या दिवसांत पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा, असे आवाहन एमआयडीसीच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.